Anganvadi morcha; अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या दडपशाहीच्या विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दि.२८ रोजी येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयावर थाळी नाद मोर्चा काढला. यावेळी मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका सहभागी झाले होते.
या आंदोलनाचे नेतृत्व राज्य अंगणवाडी कमर्चारी संघाच्या देवळा तालुका अध्यक्षा जिजाबाई अहिरराव यांनी केले होते . मानधन नको वेतन हवे , दरमहा पेन्शन पाहिजे , ग्रॅज्युटी चे फायदे मिळाले पाहिजे , नवीन मोबाईल देण्यात यावे , शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आदी मागण्यांसाठी दि. ४ डिसेंबर पासुन राज्यातील दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. बेमुदत संपावर जाण्यापुर्वी संघटनेने रितसर प्रकल्प, जिल्हा व वरिष्ठ कार्यालयात पत्र दिलेले आहे. १९७५ सालापासून अंगणवाडी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहेत.
PM Modi | मोदी नाशकात; काय आहे मोदींच्या ह्या दौऱ्यामागचे ‘गुपित’
आरोग्य, आहार, अनौपचारिक शिक्षण असे महत्वाचे काम अंगणवाडी कर्मचारी दैनदिन करीत आहेत. तरीसुध्दा राज्य शासन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने घेत नाही .शासनाच्या या दडपशाहीच्या विरोधात गुरुवारी दि. २८ रोजी अंगणवाडी कर्मच्याऱ्यांनी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला .मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष जिजाबाई अहिरराव , अंगणवाडी सेविका सुनंदा कुवर , सविता सोनवणे , मंगल सावंत , वैशाली अहिरराव , उषा आहेर , जया पवार , सरला खैरणार , अल्कला जाधव , शोभा जाधव , सुनंदा थोरात आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम