Ajit pawar: ‘शेतकरी त्रस्त आणि शिंदे सरकार मस्त’, अजित पवारांचा हल्लाबोल

0
51

ajjt pawar on eknathshinde:  राज्याचे विरोधी पक्षनेते आज कडाडले असून त्यांनी थेट सरकारचे वाभाडे काढले आहेत. अजित पवार (ajit pawar) म्हणाले की सरकार सद्या मौज करत असून शेतकऱ्यांकडे मात्र त्यांचे लक्ष नसल्याचा घणाघात केला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत अन् सरकार मस्तीत असल्याचे दिसत असल्याचा घणाघात पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना कुणी वाल  नसल्याचे चित्र असून हे चांगले नसल्याचे स्पष्ट मत अजित पवार ( ajit pawar) यांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे तर दुसरीकडे सरकार आपल्या प्रचारात करोडो रुपये पाण्यासारखा खर्च करत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पवार (ajit pawar) म्हणाले की, गेल्या 6 महिन्यांत सरकारने जाहिरातींवर 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेनरण्याचे संकेत दिले आहेत.

Pradip gavli: अंडरवर्ल्ड डॉन डॅडीचा भाऊ शिंदेंच्या ‘शिवसेने’त दाखल

‘मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील जेवणावर 2 कोटींचा खर्च’

अजित पवार यांनी नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे उदाहरण देऊन सरकारचे अपयश जनतेसमोर ठेवले. पवार म्हणाले की, राजेंद्र तुकाराम चव्हाण नावाच्या कांदा उत्पादकाने ५० किलो कांदा बाजारात विकला. राजेंद्र चव्हाण यांना मंडईतून वाहन भाडे, कपडे धुणे, मजुरी यासाठीचे पैसे कापून केवळ दोन रुपयांचा धनादेश देण्यात आला. आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याने काय करायचे, असा सवाल चव्हाण विरोधी पक्षनेत्यांना विचारत आहेत. हा मुद्दा जनतेसमोर ठेवत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. पवार म्हणाले की, गेल्या 4 महिन्यांत मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा येथे जेवण आणि चहापानासाठी दोन कोटी 38 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. जनतेच्या पैशाचा असा दुरुपयोग पहिल्यांदाच होताना दिसत आहे.

Pradip gavli: अंडरवर्ल्ड डॉन डॅडीचा भाऊ शिंदेंच्या ‘शिवसेने’त दाखल

‘मुख्यमंत्री कार्यालयात 3000 फायली धूळ खात पडल्या’

स्वत:ला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवत अजित पवार म्हणाले की, सर्वसामान्यांशी संबंधित सुमारे तीन हजार फायली मुख्यमंत्री कार्यालयात धूळ खात पडल्या आहेत. त्यावर स्वाक्षरी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही. सध्या सुरू असलेल्या पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचार आणि इतर कामांमध्ये मुख्यमंत्री इतके व्यस्त आहेत की त्यांना त्यांची जबाबदारीच विसरली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here