नौदलाच्या अग्निपथ योजनेत महिलांना २० टक्के प्रतिनिधित्व

0
11

नवी दिल्ली – केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांसाठी अग्निपथ योजना आणली होती. ह्या योजनेंतर्गत आता नौदलात आता भरती होणाऱ्यांपैकी २० टक्के महिलांना प्रतिनिधित्व दिले जाणार असल्याची माहिती नौदलाकडून सांगण्यात आले.

केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणल्यानंतर उत्तरप्रदेश, बिहार, तेलंगणा, आंध्रप्रदेश, हरयाणा आदि राज्यात विरोध झाला होता. ठिकठिकाणी आंदोलने झाली, केंद्र सरकारने त्यात अनेक बदल केले होते. मात्र या योजनेंतर्गत आतापर्यंत लाखो युवकांनी अर्ज दाखल केले.

नौदलाकडून अग्नीवीर भरतीप्रक्रिया १ जुलैपासून सुरू झाली होती त्यात आतापर्यंत १० हजार युवतींनी अर्ज केले. भरती झालेल्या अग्निवीर महिलांना ऑर्डीनन्स, इलेक्ट्रिकल, कम्युनिकेशन (ऑपरेशन्स) आदि शाखेत भरती केले जाणार आहे, असेही नौदलाकडून सांगण्यात आले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here