दिल्लीत कोणालाही टक्कर देण्याची धमक महाराष्ट्रात आहेत. काही लोक समाजात दंगली निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन पुढं जायचं आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
अजित पवार यांच्या हस्ते जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे अनावरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रेरणा मिळते. त्यांचा आदर्श ठेवून आपण पुढे गेला पाहिजे. देशावर दिल्लीवर संकट आलं, त्यावेळी महाराष्ट्र देशाच्या रक्षणासाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. तो इतिहास आपल्याला विसरता येणार नाही. शरद पवार नेहमी सांगतात, महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकलेला नाही. यापुढं झुकणार देखील नाही.
आपल्या देशावर जेव्हा, जेव्हा संकट येईल, देश वाचवण्यासाठी वेळ येईल तेव्हा महाराष्ट्र नक्की मदतीला धावून जाईल असा विश्वास आहे. गरज पडली तर महाराष्ट्र दिल्लीत कोणालाही टक्कर देईल. ही धमक महाराष्ट्रात आहे असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. दंगली घडतात तेंव्हा हातावरच पोट असणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते, त्यांच्या चुली बंद पडतात. तेव्हा राजकीय फायद्यासाठी समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी याची जाणीव ठेवावी, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंवर टिकास्त्र सोडले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम