ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीपुरवठा एक दिवस बंद असल्याने थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. ठाणे महापालिकेच्या नौपाडा- क्षेत्रातील कन्हैयानगर भागातील जलकुंभाच्या बाह्य जलवाहिनीचा वॉल बदलण्यच्या कामा करता पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.
ठाणे कोपरी परिसरचा पाणी पुरवठा शुक्रवार, २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते शनिवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ९ असा २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन पाण्याचा साठा करून ठेवण्याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे. तर जलकुंभाच्या जलवाहिनी वॉल बदलल्याने पुढील पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
तब्बल एक दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. या ठाण्यातील या भागात पाणीपुरवठा विस्कळीत त्यामुळे काम करण्यासाठी जवळपासच्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. कन्हैयानगर जलकुंभांतर्गत कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगर, नातु कॉलनी, सावरकर नगर, वाल्मीकीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरूदेव सोसायटी, कृष्णानगर तसेच स्वामी समर्थ मठ परिसर येतो. या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम