महिलेचा राहुल गांधींशी लग्न केल्याचा दावा ; गोंधळ अन माफीनामा …!

0
164

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल नेहमीच वेगवेगळ्या चर्चा होत असतात. त्यांच्या खाजगी आयुष्य बद्दल देखील अनेकदा विचारले जाते. लग्नाचा विषय तर नेटकऱ्यांचा आवडीचा झालाय. आज नाशिक मध्ये मात्र जरा अजबच घडलं

20 वर्षांपूर्वी राहुल गांधी यांच्याशी विवाह केल्याचा दावा एका 45 वर्षीय महिलेने केला त्यामुळे एकच खळबळ उडाली. कौटुंबिक न्यायालयात महिलेने आज गोंधळ घातला ,पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरणावर मात्र पडदा पडला.

महिलेच्या दाव्यात कसलेही तथ्य आढळलं नाही, त्यानंतर महिलेनं माफी मगितल्याची पोलिसांची माहिती दिली.

नाशिकरोडच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात आज सदर महिलेने या विषयावरून गोंधळ घातला. या महिलेने हा दावा करतांना चांगलाच गोंधळही घातला. आपल्याकडे प्रतिज्ञापत्र असल्याचेही तिचे म्हणणे होते. आज दुपारच्यावेळी ही घटना घडली. नाशिकरोड पोलिसांनी ताबडतोब धाव घेत या महिलेची समजूत घातल्यावर प्रकरणावर पडदा पडला.

या प्रकाराबत आम्ही महिलेची समजूत घातली, त्यानंतर तिने माफीदेखील मागितली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. मात्र महिलेच्या या अजब दाव्यामुळे हा चांगलाचं चर्चेचा विषय ठरला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here