दिवसेंदिवस राज्यातील मराठी शाळा मागे सरत चालल्यात प्रत्येक जण इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य देत आहे. मराठी शाळांमध्ये देखील उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त होते. या मुद्द्यावरच बच्चू कडूनी इंग्रजी शाळांवर निशाणा साधला आहे. जसे पैसे तसे शिक्षण असेल तर ज्यांच्याकडे पैसेच नाही, ते तुम्हाला जगू देणार नाहीत, हे तुम्हाला मी सांगतो. राज्यातील इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांच्या कारभारावर केला हल्लाबोल .
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा)ने आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीलय अधिवेशन आयेाजित कडू हे प्रमुख पाहुण म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील, प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ गावंडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री डेव्हीड प्लॅनेट आदी मान्यवर यावेळी कार्यक्रमात उपस्थित होते.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय अधिवेशनात बच्चू कडूने म्हणाले, इंग्रजी बोलतो म्हणून सगळे हुशार , इंग्रजी म्हणजे दर्जेदार असतं हे डोक्यातून काढून टाका, मराठी शाळा सुद्धा दर्जेदारच असतात, हे अभिमानाने बोलाव. आम्ही आमच्याच मायबोली भाषेला पायाखाली ठेवून इंग्रजीचा वाहवा करत असू तर ते चुकीचं
आहे. आता शैक्षणिक विषमता वाढत आहे.
पुढे कडू म्हणाले की, “आर्थिक विषमता चालेल, परंतु ज्या दिवशी देशामध्ये शैक्षणिक विषमता निर्माण होईल, त्या दिवशी देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आज मंत्र्यांची पोरगं चांगल्या शाळेत शिकतं आणि आम्हाला मते देणाऱ्याच्या पोराला शिक्षण नाही हाच आमच्या प्रश्न आहे.” इंग्रजी शिकवलेले 20 टक्के पोरं गावाच्या बाहेर जातात, 80 टक्के गावातच राहतात, त्यांच्यासाठी आमच्याकडे काय व्यवस्था आहे, ही बाब लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम