‘भारतीय संविधान’ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात

0
35

शिक्षणाच्या बोज्याखाली विद्यार्थ्यांना आपल्या संविधानाचा विसर पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखाना ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

१३ एप्रिल रोजी राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परीक्षा, प्रवेश आणि इतर कामकाजासंदर्भात नुकतीच महत्त्वाची बैठक झाली. यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीसाठी असलेले योगदान आणि त्यांच्या विचारांची ओळख याबाबत पदवी / काॅलेज विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. तरूण विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्यांची ओळख होऊ शकेल. त्यानंतर प्रत्येक शाखेच्या अभ्यासक्रमामध्ये ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा अभ्यासक्रम अनिवार्य केला जाणार आहे.

आपल्या न्याय्य हक्कांची, अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी, यासाठी शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख करून दिली जाणार आहे. या संदर्भात सविस्तर स्वतंत्र माहिती विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना दीले जाणार आहे. तसेच लवकरच परिपत्रक जारी केले जाणार असे ना. सामंत यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here