दरवर्षी पावसात मुंबईची तुंबई झालेली अवस्था आपल्याला पाहायला मिळते. ठाणे महापालिकेने या परिस्थितीचा आढावा घेऊन नालेसफाईचे कामकाज हाती घेतले आहे. दोन ते तीन दिवसांत नालेसफाईच्या कामाला सुरु करण्यात आली.पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू दर आठवडय़ाला नालेसफाईचा आढावा घेऊन कामावर लक्ष ठेवले जाणार , अशी माहिती यांनी दिली.
दर आठवडय़ाला नालेसफाईचा आढावा घेऊन कामावर लक्ष ठेवले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. शहरातील नालेसफाईची कामे दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हाती घेतली जातात. यंदा मात्र एप्रिल महिन्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्यास पाणी तुंबून नाल्याशेजारी रहिवासी भागात पाणी शिरण्याची शक्यता असते. शहरातील नालेसफाईची कामे वेळेत कधीच पूर्ण होत नाहीत. या परीस्थितीचा आढावा घेऊन. महापालिकेने यंदा ही कामे लवकर करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 जून पासून निवडणुकांना सुरुवात होत असल्याने आता राजकारणात चढाओढ सुरू झाली आहे. महानगरपालिका यंदा ३० एप्रिलपर्यंत ६५ ते ७० टक्के आणि १५ मेपर्यंत नाल्यांची शंभर टक्के सफाई पूर्ण करणार, असल्याचे जाहीर केले आहे . तशाप्रकारचे नालेसफाईची कामे ७ जून अखेरपर्यंत शंभर टक्के पुर्ण होणार आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळ्यात नाल्यामधील वाहता कचरा काढण्याचे आणि प्रवाहातील अडथळा दूर करण्याचे काम केले जाईल, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम