देशातील सर्व सामान्य जनतेसाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
42

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. मार्च २०२२ पर्यंत गरिबांना मोफत धान्य देण्याची मुदत आता सहा महिन्यांनी पुन्हा वाढविण्यात आली. सप्टेंबरपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत माहिती दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा आढावा घेऊन या योजनेस आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यात या मोफत धान्य योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, या याेजनेचा लाभ गोरगरिबांना होत आहे या योजनेला यापूर्वीच मुदतवाढ मिळाली असून, रेशन दुकानांमधून लाभार्थ्यांना धान्य दिले जात आहे. मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. सर्वप्रथम जून २०२० पर्यंत गोरगरिबांना रेशन दुकानांमधून मोफत धान्य मिळाले. त्यानंतर वेळेावेळी केंद्राने या योजनेला मुदतवाढ दिली असून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरही या योजनेला मुदतवाढ मिळाली आहे.

आता सप्टेंबर २०२२ पर्यंत मोफत धान्य मिळणार आहे. दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत दिले जात आहे. कोरोना काळात गेल्यावर्षी मार्चमध्ये जाहीर करण्यात आलेली मोफत धान्य देण्याची पीएमजीकेएवाय योजना ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली सुरू करण्यात आली. त्यानुसार प्रति किलोग्रॅम २ ते ३ रुपये अशा अनुदानित दराने धान्य पुरवले जाते. आता करोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी करोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. करोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही सर्व स्थिती लक्षात घेत योजनेला सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली गेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here