द पॉईंट नाऊ ब्युरो : दंगली पेटवायला कारणीभूत उच्चवर्णीय आणि ब्राह्मणच कारणीभूत असतात, असे वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केले आहे.
नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केल्याने वाद उभा राहिला होता. यादरम्यान, सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आधी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी असे म्हटले होते.
आता सुजात आंबेडकर यांनी दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय , ब्राह्मणच असतात असे म्हटले. तसेच राज ठाकरे यांनी राज्यात दंगली पेटवू नये असे देखील म्हटले.
आता सुजात आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम