द पॉईंट नाऊ ब्युरो : चीन हा भारताविरोधात नेहमीच काही ना काही उठाठेवी करत असतो. अर्थात, भारताच्या विरोधात चीन नेहमीच आडमुठी, संतापजनक भूमिका घेत असतो.भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो. आता चीनने भारतावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनमधील काही हॅकर्स लोकांनी उत्तर भारतातील वीज वितरण व्यवस्थेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. ShadowPad नावाचे सॉफ्टवेअर वापरून TAG-38 नावाच्या हॅकर्स ग्रुपने ग्रीडमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
चीन हा कुरापती करण्यात तरबेज आहे. आणि त्यातही त्याच्या कुरापती या मुख्यत्वे भारताविरोधात असतात. सीमेच्या मध्ये घुसखोरी करणे असो, अनधिकृत घरे उभारणे असो असे काही ना काही उद्योग चीन करत असतो. आता चीनने भारतावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न करून, आपले इरादे पुन्हा दाखवून दिले. मात्र चीनचे हे प्रयत्न भारताने हाणून पाडले. आता भारताद्वारे चीनच्या या कृतीला कसे आणि काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम