द पॉईंट नाऊ ब्युरो : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या श्रीलंकेने भारताकडे मदत मागितल्यानंतर भारताने श्रीलंकेला मदत केली आहे. भारताने श्रीलंकेला तब्बल 27 लाख मेट्रिक टनाचा इंधनसाठा श्रीलंकेला मदत स्वरूपात दिला आहे.
श्रीलंका या देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अराजकता माजली आहे. इथे प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीचे दरच गगनाला भिडल्याने इथली आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. या कारणास्तव श्रीलंकेने भारताकडे मदत मागितली होती. भारताने शद्ब दिल्यानुसार नुकतेच श्रीलंकेला 36 हजार मेट्रिक टन पेट्रोल आणि 40 हजार मेट्रिक टन डिझेल श्रीलंकेला मदत स्वरूपात पाठवले. याबाबत श्रीलंकेतील कोलंबोमधील भारताच्या उच्च आयोगाने माहिती दिली आहे.
भारत हा नेहमीच आपल्या शेजारी राष्ट्रांसह इतर देशांना शक्य तितकी मदत करण्याचा वेळोवेळी मदत करतो. आता श्रीलंका देखील आर्थिक संकटात सापडल्यानंतर भारताने श्रीलंकेला मदत पाठवली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम