लग्नकार्यात 50 लोकांच्याच उपस्थितीचा कायदा बनवण्याची मागणी

0
35

द पॉईंट नाऊ ब्युरो : कोरोनामुळे लग्न कार्यांवर बंधने आली. 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य आटोपण्याचे आदेश देण्यात आले. आता लग्नात 50 लोकांची उपस्थिती राहण्याबाबत कायदाच बनवण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेस खासदार जसबीर सिंग यांनी लोकसभेत लग्नकार्यामधील उपस्थिती आणि खाद्यपदार्थ यावर कायदाच बनवण्याची मागणी केली आहे. लग्नात 50 लोकांची उपस्थिती असावी आणि 11 च खाद्यपदार्थ बनवणे बंधनकारक असावे अशी तरतूद या कायद्यात करण्यात यावी, अशी मागणी जसबीर सिंग यांनी केली आहे.

लग्न कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. अनेकांना कर्ज काढावे लागते. यामुळे संबंधित लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात. मात्र कोरोनाच्या काळात घालून देण्यात आलेले उपस्थितीचे बंधन यावर कायदाच बनवण्याची मागणी जसबीर सिंग यांनी केली आहे.

लग्न कार्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती, त्यामुळे बनवले जाणारे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असतो. तसेच खाद्यपदार्थांची नासाडी देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. यामुळे या मागणीकडे विशेष लक्ष लागले आहे.

दरम्यान, लग्नकार्य उपस्थितीचा विशेष कायदाच बनवण्यात यावा, अशी मागणी अनेक सामान्य नागरिक देखील यावर आधी करू लागले होते. तसे मेसेजच सोशल मीडियावर फिरू लागले होते. आता काँग्रेस खासदार जसबीर सिंग यांनी यावर विशेष कायदाच बनवण्याची मागणी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here