जंजिऱ्यावर शेवटपर्यंत टिकणारे ते ‘सिद्दी’ लोक नेमके कोण आहेत? चला जाणून घेऊया

1
37

द पॉईंट नाऊ विशेष : मागच्या लेखात जंजिरा किल्ल्याविषयी माहिती तर वाचलीच असेल…

आता बघू जंजिरा किल्ला अजिंक्य ठेवणारे हे ‘सिद्दी’ नक्की कोण होते.

सिद्दी हे मूलतः पूर्व आफ्रिकेतील बांटू लोक असून एक प्राचीन समाज आहे. झांबिया, युगांडा, रवंडा, सोमालिया, दिजबुटी, एथियोपिया, केनिया सारख्या देशातील भागात ते पसरले आहेत.

7 व्या शतकात अरबी लोकांसोबत व्यापारी संबंध जोडले गेले. अरबी व्यापारी तसेच गर्भश्रीमंत बांटूना अरबस्थानात घेऊन गेले.

‘अबीसीनिया’ (इतियोपीआ) वरून त्यांना हबशी पण म्हणतात.

हे बांटू अतिशय एकनिष्ठ,कामात चोख म्हणून त्यांना सिद्दी म्हणतात. हेच सिद्दी नंतर भारतात आले. (अरबी भाषेत मास्टर)

आदिलशाह, निजाम, औरंगजेब यांच्या पदरी सुद्धा ‘बांटू’ गुलाम म्हणून आले आणि नन्तर सल्तनत मिळवून सरदार झाले.(मुस्लिम धर्म स्वीकारला)
हे ‘सिद्दी’ कुशल आणि निपुण योद्धे होते. त्यांनी खूप प्रकारच्या लढाया, युद्ध गाजवले आणि नाव कमावले. अल्लाउद्दीन खिलजीचा गुलाम ‘मलिक कफूर’ नन्तर त्याचा विश्वासू सेनापती झाला.

‘मलिक अंबर’ हा सुद्धा खूप पराक्रमी योद्धा होता जो अहमदनगरच्या निजामशहाचा लष्करप्रमुख आणि पंतप्रधान होता. सिद्दी जोहर हा तर शिवरायांना भिडला होता.(पन्हाळाचा वेढा)

तसेच 17 व्या शतकाअंती पोर्तुगीज बांटूना गुलाम म्हणून भारतात घेऊन आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय नौदलाचे जहाज येताच जंजिरावरचे सिद्दी पळून जंगलात गेले. जंजिरा आता पूर्णपणे सरकारच्या ताब्यात आहे.

‘बांटू’ जिथे गेले तिथल्या मातीत रुजले. आजही हे सिद्दी मुस्लिम/बांटू आदिवासी कर्नाटक,गुजरात, कोकणात राहतात. जवळपास 60-70 हजाराच्या आसपास त्यांची संख्या असेल. ते पूर्णपणे भारताच्या मातीशी एकरूप झाले आहेत.

माहिती कशी वाटली. प्रतिक्रिया कळवा. अश्या विविध प्रकारच्या लेखासाठी ग्रुप जॉईन करा आणि फॉलो करा ‘द पॉईंट नाऊ’.

                             – गिरीश सावळा (अभ्यासक)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here