स्त्रीयांच्या समस्यांवर बोलणार कोण ?

0
43

स्त्री आपली कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलत असते . आई , पत्नी, बहीण, मुलगी होऊन आपले घरदार सांभाळून आज सजामध्येही ती वावरत आहे.आधुनिक काळात स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात पुढे आहे .पण तरी आजही स्त्रियांवर अन्याय ,अत्याचार अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.मग ते कौटुंबिक हिंसाचार , सामाजिक अत्याचार , शिक्षणिक अत्याचार इत्यादी……

कौटुंबिक हिंसाचार म्हणजे स्त्रियांच्या विवाहानंतर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कौटुंबिक समस्या या ग्रामीण व शहरी भागात वेगवेगवेगळ्या असू शकतात. एकविसाव्या शतकात आपण वावरत असलो तरी स्त्रियावरचे अत्याचार , त्यांच्या समस्या काही कमी झाल्या नाही अनेक ठिकाणी आपण पाहतो की चूक काही ही असो पण पाहिले स्त्री ला दोषी धरले जाते.आज पाहायला गेले तर अजून हि कुठे तरी स्त्री पुरुष समानता ही झाली नाही अजून ही लोकं वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलीला आईच्या गर्भात मारले जाते….. काही लोकं मुलगी झाली की म्हणतात. ज्याच्या पदरी पाप त्याला मुलगी होते आपोआप ही दृढ भावना आजही काहींच्या मनात आहे . म्हणून स्त्रीभ्रूण हत्या हा प्रकार आजही पाहायला मिळतो. कौटुंबिक हिंसाचार हा स्त्री वर मोठ्या संख्येनं होत आहे. एखादी नविन मुलगी लग्न करून एखाद्याच्या घरी गेली आणि तिच्या घरच्यांनी तिला काहीच दिले नसेल तर कुटुंबातील सदस्य हे तिला सारखे टोचरे शब्द बोलून तिच्यावर अन्याय केला जातो . एखाद्या स्त्री ला लग्नानंतर मुल नाही झालं तर पहिला दोष स्त्री चाचं काढतात …. किंव्हा शारीरिक ,मानसिक त्रास देतात त्या स्त्रीला ….. आजही स्त्रियांवर अन्याय ,अत्याचार ,हिंसाचार ग्रामीण किंव्हा शहरी भागात होत आहेत…..

शैक्षणिक समस्या
आजही ग्रामीण भागात काही ठिकाणी मुलींना शिक्षण घेण्यासाठी पाठविले जात नाही .मुली शिकून काय करणार हा अंध विश्वास आजही ग्रामीण भागातातील पाल्य करताना दिसतात .मग काही पाल्य आपल्या गरीब परिस्थिती मूळे मुलींना दहावी पर्यंत शिकवतात आणि नंतर मुलीचे शिक्षण थांबवतात .पुढे मुलगा आपले भविष्य असं म्हणून मुलाला शिकवतात ….म्हातारपणाची काठी हा मुलगा आपला वंशाचा दिवा … त्यामुळे शैक्षनिक दृष्ट्या ही स्त्री ला आत्यार सहन करावा लागतो.आज मुलींच्या शिक्षणासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहे त्याचा फायदा करा आणि आपल्या मुलीला बहिणीला शिक्षण द्या चूक आणि मुल सांभाळणे हा मुलीकडे /स्त्री कडे पाहण्याचा दृष्टिकोन,मानसिकता आता बदला …. कारण स्त्री शिक्षित झाली तर खरया अर्थाने प्रगती झाली असे म्हणेन मी …..

सामाजिक हिंसाचार
सामाजिक हिंसाचार हे शहरी भागात जास्त प्रमाणात होत असतात. समाजाकडून विविध प्रकारचे अन्याय, अत्याचार होत असतात. एखाद्या स्त्रीची छेडछाड म्हणा ,विनयभंग , बलात्कार, चाकू हल्ले , अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते स्त्रियांना …. आज पुरुषाच्या लेखी स्त्री ला दुय्यम स्थान दिले जाते …. आजची पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असली तरी तिला आपला मान सन्मान सर्वच ठिकाणी मिळतो असे नाही…. कारण हजारोंच्या संख्येने समाजामध्ये लोकं राहत असतात कोण कसा असेल याची थोडी ही कल्पना ही स्त्री ला नसते….समाजात काही पुरुष आजही स्त्रियांना स्वतःची मालकी वस्तू असल्यासारखे पाहत असतात… लहान लहान मुलींवर ही आज बलात्कार कीव्हा मानसिक अत्यार होत राहतात पण काही ठिकाणी या प्रकारावर आवाज उठवला जातो तर ग्रामीण व शहरी काही ठिकाणी या प्रकारावर आवाज उठवला जातं नाही. एकट्या स्त्री ला पाहून पुरुष हे तिच्यावर बळजबरी करायला पाहतात स्वतःला वाचण्याच्या अथक प्रयत्नानंतर ती शेवटी कमजोर होते आणि आत्याचाराला बळी पडते असे प्रकार हे अनेक ठिकाणी होत असतात पण या विरोधी कोणी जनजागृती करत नाहीत .

आरोग्य
आपल्या देशात अनेक ठिकाणी स्त्रिया या कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत. अशक्तपणा , सांधेदुखी , पाठदुखी इत्यादी आजाराने निधन होतं आहे .ग्रामीण भागात किव्हा शहरी भागात ही स्त्रीचं काही दुखणे असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यायचा नाही घरेलु उपाय करून ठीक व्हायचा असा गैरसमज काही लोकांचा असतो लहान लहान दुखण्याला डॉक्टर कशासाठी … ! आणि अंगावर काडून आजार ती स्त्री जगत असते … पण बघता बघता हे लहान आजार कधी मोठे होतात हे कळतच नाही ….!

भावनिक समस्या
सामजिक संदर्भात पाहायला गेले तर स्त्रियांवर जास्त बंधने असतात..त्यांना अनेक वेगवगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात….त्यामुळे स्त्रियांमध्ये ताणाचे प्रमाण हे पुरुषापेक्षा जास्त असते.त्यांच्या भावनिक समस्या ह्या वाढत जातात .पुरुष आणि स्त्री च्या मानसिक भावनिक समस्यांची तुलना कोणी करू शकत नाही.. पुरुषा तुलनेत स्त्रियांमध्ये आजाराचे प्रमाण हे जास्त आढळते. उदा.मासिक पाळी म्हणा, गरोदरपणा प्रसूती असे आजार स्त्रियांमध्ये असतात खरं तर हे सारं उघड आहे मात्र नैराश्य हे त्यांच्या नशिबी जास्त असते.अनेक स्त्रिया मानसिक तणावामुळे आपले आयुष्य संपवतात …

कुठे तरी हे स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार हिंसाचार आता थांबविले पाहिजे….. या समाजामध्ये स्त्रियांच्या समस्यांचे निरसन झाले पाहिजे…..

@लेखिका:पूनम गमरे(मुंबई)
भ्रमणध्वनी:८६५७३७९०३७


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here