द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला आहे. व अखेर आज राणे यांना अटक करण्यात आली.
एनडीए सरकारच्या काळात विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपवर नामुष्की ओढवली आहे. यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला अटक करणारे भाजपाच्या एकेकाळचे सोबती शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे. यामुळे या अटकेला वेगळं महत्व आहे.
राणे यांनी 7 जुलैला केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्याकडे लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खाते देण्यात आले होते. राणेंना अटक झाल्याने ते 20 वर्षांत अटकेची कारवाई झालेले पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. त्यामुळे राणेंच्या अटकेने एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या अटकेवर मोठ्या प्रमाणात मिम्स बनले आहेत.
न्यायालयाने राणेंना जामीन देण्यास नकार दिला होता. तांत्रिक मुद्द्यावर हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. नाशिकमध्ये गुन्हा दाखल असताना रत्नागिरीत जामीन अर्ज का, या मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणेंच्या वतीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज करण्यात आला होता. परंतु, उच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. यामुळे राणेंना अटक होणार हे स्पष्ट झाले होते. व त्यानुसार अटक झाली.
राणेंवर चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमध्येही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे आणि शत्रूभाव निर्माण करण्यासाठीच्या कलमांचा समावेश आहे.
नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाडमध्ये भादंवि कलम 153, 189, 504, 505 (2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम