नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : देशसेवा करण्यासाठी सीमेवर जाऊनच लढावं लागतं असं नाही! तर आपण दिलेल्या रक्तातून सुध्दा समाजातल्या असंख्य रुग्णांचे प्राण वाचवू शकतो,व रक्तदानातून निखळ आनंद मिळवू शकतो.असे प्रतिपादन मालेगाव ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी समाधान शिंपी यांनी केले
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात “रक्तदान काळाची गरज” या विषयावर प्रमुख व्यख्याते म्हणून ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी रासेयो कार्यक्रम अधिकारी सी.डी. राजपूत डॉ. नरेंद्र ढोके, प्रा.वैशाली साळुंखे उपस्थित होते.सूत्रसंचालन निकिता खैरनार यांनी केले व आभार नेहा शुक्ला हिने मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल पवार,रवी वाघ संघपाल खरे,अभिषेक दाणी,महेश वेताळ यांच्यासह मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम