द पॉईंट नाऊ ब्युरो : अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनाची घटना घडून भारताचे 7 जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. कामेंग सेक्टर येथे हिमस्खलन झाल्याने 7 जवान बेपत्ता झाले होते. लष्कराने यासाठी शोधमोहीम सुरु केलेली होती. मात्र अखेर दुःखद बातमी हाती आली आहे.
भारताचे जवान देश सीमांच्या संरक्षणार्थ सदैव कामेंग सेक्टरमध्ये तैनात असतात. इथे उंच भागात झालेल्या हिमस्खलनाने भारतीय सैन्याचे 7 जवान शहीद झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
लष्कराच्या शोधमोहीमेत या सातही जवानांचे मृतदेह हाती लागले. याबाबत लष्कराने माहिती दिली आहे. भारताचे हे सातही जवान गस्तीवर होते. मात्र अचानकपणे झालेल्या हिमस्खलनाने या जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम