टाकेद-करंजी नदीवरील पुलाच्या कामाला सुरवात

0
32

सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : नगर-नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या टाकेद परिसरातील करंजी नदीवरील पुलाच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली असून या नवीन पुलाच्या कामामुळे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जवळपास पन्नास गावांचा येण्या जाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून म्हैसवळन घाट रस्त्याच्या सुरुवातीला असणाऱ्या टाकेद-चौराईवाडी परिसरातील करंजी नदीवरील पुलाची मोठी दुरवस्था होती.या नदीवरील असलेल्या कमी उंचीच्या पुलाची झालेली दुरवस्था व पुलाला नसलेल्या संरक्षण कठडे या परिस्थितीत पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी असायचे या परिस्थितीमूळे नगर-नाशिक या दोन जिल्ह्यांतील अकोले आणि इगतपुरी तालुक्यातील अनेक वाहनचालक, प्रवासी, चाकर मान्यांचा, जनसामान्यांचा प्रवास बंद व्हायचा, त्यात पुलाच्या ठिकाणी असलेल्या नागमोडी वळणामुळे अनेक छोटे मोठे अपघात व्हायचे , इगतपुरी तालुक्यातील टाकेद गटातील जवळपास वीस पंचवीस गावे व चाळीस वाड्या वस्त्यांतील ग्रामस्थांचा येण्याजाण्याचा टाकेद ते म्हैसवळन घाट हा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता आहे. यासोबतच अडसरे बु,फळवीर वाडी, चौरेवाडी, धानोशी, मायदरा, ठोकळवाडीतील शेतकरी ग्रामस्थांची रोज या रस्त्याने टाकेद तीर्थ क्षेत्री ये-जा असते परंतु पावसाळ्यात या रस्त्यावरील जुन्या करंजी पुलावरून पुराचे पाणी असल्याने या परिसरातील ग्रामस्थांची दळणवळणाची अत्यंत गैरसोय व्हायची या परिस्थिती संदर्भात या भागातील रस्ते पूल ,पुलावरील संरक्षण कठडे या समस्यांसंदर्भात शेतकरी नेते महेश गाढवे, सभापती सोमनाथ जोशी, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, राष्ट्रवादी नेते पांडुरंग वारुंगसे आदींनी आवाजही उठवला होता. हीच परिस्थिती आमदार माणिकराव कोकाटे यांनी लक्ष्यात घेतली व या नगर-नाशिक दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या अकोले-इगतपुरी तालुक्याना जोडणाऱ्या म्हैसवळण घाट करंजी नदीवरील रस्त्यावरील पुलाचे काम मंजूर केले. सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक एफ डी आर अंतर्गत नवीन हा नवीन पूल मंजूर झाला असून सदर पुलासाठी एक कोटी पंचवीस लक्ष्य निधी मंजूर असल्याचे आमदार कोकाटे यांचे स्वीय सहाय्यक संजय डावरे यांनी सांगितले.

दरम्यान या नवीन पुलाच्या कामामुळे या भागातील जवळपास शेकडो गावांचा संपर्क वाढणार असून पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे बंद असलेला करंजी नदी पूल रस्ता प्रश्न कायमचा सुटला आहे.अनेक शेतकरी, ग्रामस्थ,प्रवासी,वाहनधारकांची डोकेदुखी अखेर मिटनार आहे.

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून मंजूर असलेल्या व सध्या नवीन पुलाचे काम चालू असलेल्या करंजी नदी वरील पुलाची समस्या मिटल्याने या परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थ,नागरिक,प्रवासी वाहनधारकांनी आमदार कोकाटे यांच्या विकास कामांसंदर्भात आभार व्यक्त केले.

“नगर-नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या करंजी नदीवरील पुलाची गेल्या अनेक वर्षांपासून मोठी दुरवस्था होती.या कमी उंचीच्या जीर्ण झालेल्या पुलावरून पावसाळ्यात पुराचे पाणी असायचे या कारणास्तव या भागातील अनेक गावांचा संपर्क बंद असायचा परंतु हा मोठा प्रश्न आमदार कोकाटे यांनी सोडविल्याने शेतकऱ्यांसह,प्रवासी वाहनधारकांची मोठी समस्या मिटली आहे.”
– महेश गाढवे ,शेतकरी नेते धामणगाव

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here