द पॉईंट नाऊ ब्युरो : भारतीय क्रिकेट संघ आज वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळण्यास उतरला. यावेळी संघातील सर्व सदस्यांनी हाताला काळी पट्टी बांधली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी काळी पट्टी आपल्या हातावर बांधली.
यावरून भारतीय क्रिकेट संघ आणि लता मंगेशकर यांच्या विशेष नात्याची आठवण काढली गेली.
1983 साली भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. संपूर्ण भारतासाठी तो अतिशय आनंदाचा क्षण होता. मात्र आज जगभरातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना असलेल्या BCCI कडे त्यावेळी विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी देखील पैसे नव्हते.
BCCI च्या त्या अडचणीवेळी भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर धावून आल्या. लता मंगेशकर यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम केला. ज्याचं त्यांनी एक रुपयाही मानधन घेतले नाही. मात्र त्या कार्यक्रमातूनच 20 लाख रुपये जमले. ज्याद्वारे विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंना प्रत्येकी एक-एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. यामुळे भारतीय संघ आणि लता मंगेशकर यांचे विशेष नाते बनले.
आज भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काळ्या पट्ट्या परिधान केल्या. यावरून आज या विशेष नात्याची आठवण काढली गेली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम