ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

0
43

नाशिक प्रतिनिधी : राज्यातील ग्रामपंचायतींच्या मुदत संपून बराच कार्यकाळ लोटला गेला, कोविडीच्या पार्श्वभूमीवर विलंब झाला, राज्यात वातावरण निवळत असतांना, ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी Grampanchayat Elections महाराष्ट्र निवडणूक आयोगाने Maharashtra State Election Commission प्रभाग रचनेचा कार्यक्रम रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

नुकतेच आयोगाने याकरिता दिलेल्या कार्यक्रमानुसार दि. 25 फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येऊन हरकती, सूचना मागविण्यात याव्यात व दि. 4 मार्चपर्यंत हरकती नोंदविण्याची अखेरची मुदत असेल. दि. 7 मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणीसाठी उपविभागीय अधिकार्‍यांकडे सादर करण्यात यावी. दि. 15 मार्च रोजी प्राप्त हरकती, सूचनांवर सुनावणी पूर्ण करण्यात येईल. दि. 31 मार्च रोजी हरकती, सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.

मुदत संपणार्‍या तालुकानिहाय ग्रामपंचायत संख्या

दिंडोरी- 56, कळवण- 38, सिन्नर-16, देवळा- 26, नाशिक- 30, येवला- 11, बागलाण- 54, चांदवड- 36, इगतपुरी- 7, सुरगाणा- 61,मालेगाव- 13, निफाड -10, त्र्यंबकेश्वर- 58, नांदगाव- 21, पेठ- 72.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here