द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्रात ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) हे वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण करत आहेत. त्यांची वादग्रस्त भाषा त्यांना चांगलीच भोवली असून सातारा पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतले आहे.
बंडातात्यांचा आज देवळा तालुक्यात कार्यक्रम होणार होता मात्र त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने आजचा कार्यक्रम रद्द झाला आहे, बंडा तात्यांनी सुपरमार्केटमध्ये वाइन (Wine) विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसेच राजकीय नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. राष्ट्रवादीकडून (NCP) राज्यभरात आंदोलन केले जात असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
बंडातात्या यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात ‘दंडवत दंडुका’ आंदोलन (Agitation) साताऱ्यात करण्यात आले. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा उल्लेख केला होता.
महिला आयोगाने बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आला होता. गुरुवारी पोलिसांनी बंडातात्यांच्या दोन्ही मठांवर पोलीस बंदोबस्त ठेवला. यानंतर शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि मठातून त्यांना ताब्यात घेतले आहे. साताऱ्यातील फलटण करवडी येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
बंडातात्या म्हणाले होते की, उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला त्यांनी होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? अशी विचारणा झाली असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असे ते म्हणाले. अजित पवारांनी (Ajit Pawar) दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरे खुली करायची नाहीत असे सांगितले. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी आहे, असेदेखील ते म्हणाले होते. यामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली होती.
सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख
त्यांनी नेत्यांची मुले दारुच्या आहारी गेल्याचे सांगून काहींची नावेदेखील घेतली होते. पतंगराव कदम यांच्या मुलाचे निधन कसे झाले होते ते विचारा? असेदेखील ते पत्रकारांना म्हणाले. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचादेखील उल्लेख त्यांनी केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचे नाव सांगा असे आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिले होते. आपण नावे घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितले तर आपण तेही सिद्ध करु शकतो असे बंडातात्या यांनी स्पष्ट केल आहे.
बंडातात्यांनी मागितली माफी
बंडातात्या यांनी माफीनामादेखील मागितला आहे. ते म्हणाले की, ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझे चुकले असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचे असेल तरी क्षमा मागण्यात कमीपणा नाही, असे त्यांनी असे म्हणाले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम