द पॉईंट नाऊ ब्युरो : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करतेवेळी एक सूचक असा इशारा दिला.
करचुकवेगिरी करणाऱ्यांना आपल्या संपूर्ण मालमत्तेवर पाणी सोडावे लागू शकते. निर्मला सीतारामन यांनी आयकर विषयावर बोलतांना, कर भरणाऱ्यांचे सर्वप्रथम आभार मानले. मात्र याचवेळी त्यांनी करचुकवेगिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
जे कुणी कर चुकवत असतील, अशांच्या संपत्तीवर छापा टाकल्यावर त्यांची सर्वच संपत्ती जप्त केली जाणार आहे. त्यामुळे आता कर चुकवणाऱ्या लोकांना मोठी किंमत वसूल करावी लागेल.
देशाच्या आर्थिक तिजोरीत कराचा मोठा वाटा असतो. मात्र देशात कर चुकवणारे देखील खूप जण आहेत. सरकार वारंवार कर भरण्यासाठी मुदतवाढ देत असते. मात्र तरी देखील कर न भरणारे वठणीवर येत नाहीत. अशांना हा सीतारामन यांचा इशारा खूप काही सूचित करून गेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम