कृषि प्रधान देशात व्यापार धार्जिणा ‘अर्थसंकल्प’

0
32

नाशिक प्रतिनिधी : आजचे बजेट म्हणजे कृषिप्रधान देशात उद्योप्रधान अर्थसंकल्प हे अशी टीका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील कांदा, ऊस, द्राक्षे, संत्रा, कापूस,केळी आदी प्रमुख नगदी पिकांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणे गरजेचे होते, मात्र या बजेटमध्ये भ्रमनिरास झाला आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारकडून शेतीला रासायनिक खतमुक्तीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सेंद्रिय शेती झिरो बजेट शेतीचे धोरण तयार केले आहे, परंतु शेतमालाच्या अत्यल्प भावामुळे रासायनिक खतांच्या माध्यमातून उत्पादन वाढीतून शेतकरी कमी भावातही उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करत असतात.

शेतमालाच्या बाजार भावाविषयी कोणत्याही प्रकारचे सरकारकडून निश्‍चित धोरण नसल्याने तात्काळ सेंद्रिय शेतीकडे एकदम वळणे व त्या त्या पिकाची हेक्टरी उत्पादकता साधणे सध्या तरी सहज सोपे नाही. यासाठी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजार भाव ठरवून देण्याचे धोरण सरकारने तयार करणे गरजेचे होते. एकंदरीतच शेतकऱ्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव असे काही नसल्याचे दिघोळे यांनी म्हटले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here