औरंगाबाद प्रतिनिधी : राज्य सरकारने नुकतेच राज्यात वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला. यावर खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात आपला निषेध व्यक्त केला आहे. औरंगाबाद च्या सुपरमार्केटमध्ये आणि दुकानात वाईन विकू दिले जाणार नाही, तर शिवसेनेचा मंत्री आणि नेत्यांनी अशा दुकानांचे उद्घाटन केल्यास ती दुकाने आम्ही फोडून टाकू असे खुले आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.
राज्य शासनाने महामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला होता परंतु तीच दुकाने आता पुन्हा सुरू झाली आहेत . त्यामुळे एकीकडे दारूवर प्रतिबंध घालण्याऐवजी सरकार सुपरमार्केटमध्ये दारू विकण्यास परवानगी देत असल्याने याचा पुढील पिढीवर वाईट परिणाम होऊ शकतो असे भाष्य इम्तियाज जलील यांनी केले .
या सर्व गोष्टींना निषेध करण्यासाठी यासाठी राज्यातील सर्व माता भगिनी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत जिथे कुठे सुपरमार्केटमध्ये वाईनची दुकाने दिसतील ते तत्काळ फोडण्यात येतील असा इशारा इम्तियाज जलील यांनी आज दिला. एकीकडे राज्य सरकारच्या या निर्णयाच्या काही पक्ष निषेध करत असताना आम्ही निषेध नोंदवत थेट आता दुकाने फोडून टाकू असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकार सांगते तर मग शेतकऱ्यांना गांजा आणि चरस पिकवण्यात परवानगी द्यावी अशा खोचक शब्दात जलील यांनी निषेध व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की वाईनऐवजी दुध विक्रीला अधिक महत्त्व द्यावे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम