मधमाश्यांविषयी हे ठाऊक आहे का? ; त्या संपल्या तर मनुष्यही संपेल

0
35

द पॉईंट नाऊ विशेष : मधमाशी हा एक समाजशील कीटक आहे. मधमाशी antartica सोडून पृथ्वीवर सर्वत्र आढळते. मधमाशांना अनन्यसाधारण महत्व आहे. तो फक्त साधारण कीटक नाहीये.

मधमाशी समाजशील कीटक असून राणीमाशी, कामगार माशी आणि नरमाशी असे त्यांचे प्रकार असतात. राणीमाशी नावाप्रमाणे राणी असते. राणीमाशी ऐशआरामाच जीवन जगते. ती फक्त अंडी देण्याचे आणि मध खायचे काम करते. नरमाशी प्रजनन करून मरून जाते. कामगार माशी फुलांमधील मकरंद गोळा करून आणते. त्यांच्या पोटातील enzyme(विकर) सोबत अभिक्रिया होऊन ते उलटी करतात. त्यालाच आपण मध म्हणतो.

मधामध्ये fructose, glucose प्रकारची साखर असते. तसेच calcium, iron हे तत्व पण असतात. मध हे खरेतर मधमाशांचं अन्न असतं. त्यांनी इतक्या मोठ्या कष्टाने मेहनतीने बनवलेल्या मधावर आपण डल्ला मारतो, आपण ते चोरतो. मग मधमाशा आपल्यावर हल्ला करणारच की राव!

जर पृथ्वीवर मधमाशा नाहीशा झाल्या तर 10-12 वर्षात मनुष्यप्राणी पण संपेल.

ते कसं?

तर ते असं की…

मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर मकरंद गोळा करते तेव्हा ती परागीभवनाचं खूप मोठं काम करते.

तुम्हाला विश्वास बसणार नाही.
मधमाश्यांमुळे आपल्या सर्वच प्रकारच्या पिकांचं उत्पादन हे 50-60% वाढते.

जर आपण मधमाश्याना संपवलं तर आपण आपल्यालाच संपवतोय हे लक्षात घ्या. जर मधमाश्या संपल्या तर परागीभवन थांबेल आणि ते संपलं की उत्पन्न घटून मनुष्य उपासमारीने मरेल.

 

   – गिरीश सावळा (Microbiologist)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here