वैभव पगार
म्हेळुस्के प्रतिनिधी : दिंडोरी तालुक्यातील श्रीक्षेत्र करंजी हे भगवान दत्तात्रयांचे आजोळ म्हणून ओळखले जाते. येथील आश्रमांचे ठाणापती महंत परमपूज्य श्री सुभाषगिरीजी महाराज यांचे आज ( गुरुवारी ) दुःखद निधन झाले .
त्यांचा समाधी सोहळा उद्या शुक्रवार, (दि. २८) रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र करंजी देवस्थान येथे होणार असल्याची माहिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील यांनी दिली. महंत सुभाषगिरीजी महाराज यांचे वय ८० वर्षे पेक्षा जास्त होते . त्यांनी जवळपास २१ वर्षे मौन पाळले . त्यांनी करंजी आश्रमांचे ठाणापती पद स्वीकारल्यानंतर परिसराचे सौंदर्य वाढविले . त्यांच्या निधनाच्या बातमीने भाविकांत शोककळा पसरली असून त्याच्या समाधी सोहळ्यासाठी अनेक महंत उपस्थित राहणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम