“तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा”
हा जयघोष करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस
या महान विभुतीचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा मधील कटक या शहरात झाला. त्यांच्या आईचे नाव प्रभावती व वडिलांचे नाव जानकी नाथ होते. ते फार मोठे नामवंत वकील होते. तसेच बंगालच्या विधानसभेचे सदस्य होते. इंग्रज सरकारने त्यांना रायबाहद्दुर हा किताब दिला होता.
सुभाषचंद्र हे त्यांचे सहावे अपत्य होते.
सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नीचे नाव एमिली व मुलीचे नाव अनिता होते.
भारतीय स्वातंत्र्य लढयात ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेऊन भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली,त्या थोर विरांमध्ये नेताजींचे नाव आदराने आवर्जून घेतले जाते.
त्यांचे कार्य महत्वपूर्ण असून आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारे अन्यायाविरुध्द हातात शस्त्र उठवायला लावणारे आहे. नेताजींच्या आंदोलनाची इंगर्जांनी धास्ती घेतली होती. नेताजींचे एकूण जीवनच देशभक्त क्रांतिकारकांचे व रोमांचकारी आहे. परदेशात
जाऊन इतर मित्र राष्ट्रांच्या साहाय्याने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. हे त्यांच्या धडाडीचे,
संघटना कौशल्याचे,समय सूचकतेचे व मुत्सद्देगिरीचे निदर्शक आहे. त्यांचा स्वभाव दृढ निश्चयी व प्रसंगी कठोर होता. त्यांचे वागणे
मात्र सौजन्यशील होते. त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. मूळात त्यांचा कल अध्यात्मिक साधने कडे होता. दूरदृष्टी, धडाडी,
आत्मविश्वास आणि निर्भय होता, यामुळे ते डगमगले नाहीत.
आजच्या युवकांनी त्यांचा आदर्श बाळगणे गरजेचे आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस
माझे आहेत श्रद्धास्थान,
युवकांनी प्रेरणा घ्यावी
मम अंतरी शोभे त्यांचे अधिष्ठान!
🚩✒️सौ. स्मिता गणेश पाटील, रायगड
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम