द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रातली वीज जाण्याचे संकेत महाविकास आघाडी सरकार मधील ऊर्जा मंत्री यांनी दिले आहेत.
विजेचा वापर हा उद्योग क्षेत्र, शेती यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असतो. मात्र वीज वापरून त्याचे बिल अदा न करणारे खूप जण आहेत. महावितरणतर्फे आत्तापर्यंत भरपूर वेळा वीजबिल भरण्याबाबत सूचना केल्या गेल्या आहेत. मात्र अद्याप भरपूर जणांनी वीजबिल अदा केलेले नाही.
वीजबिल अदा न करणारे वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पाणीपूरवठा, सार्वजनिक पथदिवे यांची वीजबिले अद्याप भरलेली नाहीत. त्यामुळे या थकबाकीदारांकडून वीजबिल वसूल करण्यासाठी त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. या प्रकारची मोहीम राबविण्याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे आता वीजबिल थकबाकीदारांना वीजबिल भरावे लागेल. अन्यथा त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम