‘हॉटेल’च्या वारींपेक्षा मुंबईची वारी ‘लय भारी’

0
34

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : मतदारांच्या पाया आम्ही पडतच राहू कारण ते आमच्यासाठी देव आहेत, ज्यांनी पैसे घेऊन स्वाभिमान विकला अशा मतदारांचे देखील आम्ही आभारीच आहोत. हे अतुल पवार कोण आहेत की त्यांच्यावर उदयकुमारांनी बोलावे, साहेब हे शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी असल्या ‘साम्राटांवर’ बोलावे इतके हे मोठे नाहीत. यांनी आज जे स्पष्टीकरण ‘द पॉईंट नाऊ’ कडे दिले मला खात्री आहे हे यांना कोणीतरी लिहून दिले असेल. यांच्यात इतकी हिम्मत असेल तर यांनी अजूनही सभा घेऊन आम्ही जे बोललो त्याच खंडन करावे.

उठसुठ मुंबई वारी ही राज्याचे नेते असल्याने कराव्या लागतात यांचे तालुक्याच्यापलीकडे जाण्याची परिस्थिती नाही म्हणून यांना बियरबार अन हॉटेल इतक्याच वाऱ्या माहिती आहेत, मुंबईत यांना जायचे असेल तर नेत्याला विचारावे लागेल अशी यांची परिस्थिती म्हणून यांनी मुंबई वारींवर बोलू नये, महाराष्ट्रात ‘वारी’ हा पवित्र शब्द असून यांच्या तोंडून तो शोभणारा नाही.

गावातील 100 लोक समोर उभे करा अन त्यातील भाग्यश्री पवारांनी आपल्या वॉर्डातील किमान 10 लोक ओळखून दाखवा असे आवाहन देखील आहेर यांनी केले. आज आम्हाला माफी मागायला लावताय मतदारांची आम्ही जाहीर सभेत पैशाबद्दल बोललोय तेव्हाच तुम्ही सभा घेऊन खंडन करायला हवे होते उगीचच आता कोणी प्रतिक्रिया लिहून देतंय म्हणून फुशारक्या मारू नका. स्वतःच्या बुद्धीवर राजकारण करा असा सल्ला देखील अश्विनी आहेर यांनी दिला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here