पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा नगर पंचायत निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी ठरलेले वार्ड क्रमांक 11 ची निवडणूक ही चर्चेचा विषय होती. याठिकाणी शिवसंग्राम संघटनेच्या अश्विनी उदयकुमार आहेर तर भाजपा तर्फे भाग्यश्री अतुल पवार या एकमेकांच्या सामने उभे ठाकले होते. उदयकुमारांच्या सभेने वातावरण ढवळून निघाले तर अतुल पवारांनी ‘शांतीत क्रांती’ करत मतदारांना आपलेसे केले या वॉर्डात उदयकुमार यांच्या झालेल्या दोन सभा फार गाजल्या त्यात अतुल पवार म्हणजे केदा आहेर यांचा ‘पोपट’ आहे असं म्हणत चांगलाच समाचार घेतला होता.
काल निकालानंतर अतुल पवार ‘द पॉईंट नाऊ’ शी बोलतांना म्हणाले केदा आहेरांच्या पोपटाने चोच मारली’ अन विकासाच्या मुद्द्यावर विक्रमी मतांनी निवडून आलो, जनता भूलथापांना बळी पडत नाही , माझ्यावर आरोप झाले असतील त्यांना मी कामातून उत्तर देतो असे म्हणत अतुल पवार यांनी विजयी प्रतिक्रिया दिली.
तालुक्यातील राजकारणात भाजपाचा एकछत्री अंमल पुन्हा अधोरेखित होऊन भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेरांनी चमत्कार करत सत्ता प्रस्थापित केली. विरोधकांमध्ये एकजूट नसल्याने अनेक वॉर्डात भाजपाला विजय मिळवणे सोपे गेले. भविष्यात भाजपाचा विजयी वारू रोखण्यासाठी विरोधकांची वज्रमुठ गरजेची आहे. तसे न झाल्यास भाजपाला तालुक्यातून हलवणे कठिक आहे.
अतुल पवार हे केदा आहेर यांचे अतिशय विश्वासू व निकटवर्तीय मानले जातात, त्यांच्या विजयासाठी व अश्विनी उदयकुमारांच्या पराभवासाठी भाजपाने जंगजंग पछाडले, शिवसंग्रामचा नगरपंचायतीत प्रवेश झाला असता तर तालुक्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल झाले असते याची कल्पना भाजप नेतृत्वाला असल्याने त्यांनी कंबर कसून तीनही उमेदवार पराभूत करत विजयश्री खेचून आणली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम