‘होममिनिस्टरांच्या’ प्रचारासाठी शिवसंग्रामच्या ‘उठसुठ’ सभा

0
36

देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणुकीत शिवसंग्रामच्या अर्थात उदयकुमारांच्या सभा वगळता कोणीही सभांवर भर दिला नाही, साधी चौक सभा देखील घेतली नाही. मात्र उदयकुमारांनी ‘होममिनिस्टरांच्या’ अर्थात आपल्या पत्नीचा प्रचारासाठी एकूण चार सभा घेतल्या असल्याने “उठसुठ” सभा घेऊन काय साध्य होणार आहे याची चर्चा सर्वत्र आहे.

नगरपंचायत निवडणूक अतीशय रंजक वळणावर आहे, भाजपाला तसे सुरवातीपासून वातावरण पोषक आहे, मात्र राष्ट्रवादी सह वीरोधकांच्या फुटीत भाजपाचा मार्ग अजून सुखकर झाला. राष्ट्रवादीने मोठ्या कसरतीने उमेदवार शोधून उभे केले, काही ठिकाणी सूचक गायब झाले अर्थात गायब केले तर काही ठिकाणी उमेदवार भेटला नाही म्हणून हक्काचा ‘हुकमी राज’ उमेदवार तीन ठिकाणी देऊन आपली इब्रत वाचवण्याची धडपड सुरू होती. मात्र हे सर्व उघडे होऊन राष्ट्रवादीचा कट्टर विरोधक असल्याचा बुरखा टराटरा फाटला, भाऊबंदकीच्या सलोख्याचे कारण पुढे करत होणाऱ्या माघारी राजकीय भूमिकांना छेद देणाऱ्या ठरल्या. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी पक्षाशी एकनिष्ठ राहणे गरजेचे असतांना आपल्या स्वार्थापोटी किंवा पराभवाच्या भीती पोटी होणारे निर्णय अतिशय दुर्दैवी झालेत.

या निवडणुकीत उदयकुमारांच्या आजची धरून चौथी सभा असणार आहे. पहिल्या सभेतील मुद्दे पुन्हा रिपीट होत असतील तर मग सभा कशाला हवी असा प्रश्न विरोधक खाजगीत बोलतात, एका मोठ्या नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की गॅस कनेक्शन , टपरी धारकांचा मुद्दा हा विषय अजून कितिदिवस चघळणार आहेत. यांचे मुद्दे जुने झाले असून लोकांना ऐकायला बोर होत आहे. आरडाओरडा केल्याने लोकांचे परिवर्तन होत नाही. सभा घेऊन मतपरिवर्तन स्थानिक निवडणुकीत शक्य नाही. भाषण कला अवगत आहे म्हणून त्याच मुद्द्यांची परत परत मांडणी अन नकला योग्य नाहीत यासह अनेक मुद्द्यांना हात घातला.

अश्विनी उदयकुमार आहेर यांचा सामना थेट सुलभा जितेंद्र आहेर यांच्याशी होत असून सुलभा आहेर यांचा हा पारंपारीक वॉर्ड आहे, यामुळे शिवसंग्रामची उमेदवारी या वॉर्डात म्हणजे उंटाचा मुका घेण्याचा प्रकार असल्याचे खाजगीत अनेकजण बोलतात, मात्र काही जाणकारांच्या मते उदयकुमारांनी या वॉर्डात उमेदवारीचा निर्णय घेतला याचा अर्थ काहीतरी शिजतंय कदाचित यामागे मोठे राजकीय समीकरण असावे. असा कयास बांधणारा वर्ग देखील मोठा आहे.

शेवटी एकच उमेदवार दोन वॉर्डात अन घरच्या उमेदवारासाठी 4 सभा हे समीकरण कठीण असून उदयकुमारांच्या डोक्यात चाललंय तरी काय हे आजच्या सभेतून समोर येईलच, मात्र त्यांच्या सभांनी ‘मतपरिवर्तन’ होणार की ‘मनोरंजन’ हे ज्याच्या त्याच्या वैचारिक पातळीचा भाग असणार हे ही नक्की, देवळ्याचे भविष्य मतदारांच्या हातात असून त्यांनी ठरवावे आपल्याला कोण हवे…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here