द पॉईंट नाऊ : कोरोनाच्या प्रकोपाला रोखण्यासाठी लस घेणे महत्वाचे आहे. मात्र लोक लस घेतांना दिरंगाई करत आहेत. मात्र आता लस घेतली नसेल, तर दे 15 दिवसांनी 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जगभर कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सगळे त्रस्त झाले होते. सारे जग अस्ताव्यस्त झाले होते. म्हणून युद्ध पातळीवर संशोधन करण्यात येऊन कोरोनासाठी लस उपलब्ध करण्यात आली.
कोरोनावरील लस ही आज प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. शासनाने सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला. भारतात 125 कोटींहून अधिकचे लसीकरण झाले आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर लोक लस घेण्यात दिरंगाई करत आहेत. आता अशांना मोठा झटका बसणार आहे. तुम्ही जर कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आणि दुसरा घेण्यास टाळाटाळ करत असाल, तर आता तुम्हांला दर 15 दिवसांनी 500 रुपयांचा दंड भरावा लागेल. असा निर्णय औरंगाबाद येथील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
कोरोनावरील लसीबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहेत. तर कोरोना गेला या संभ्रमात लोक आहेत. मात्र आता कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. मात्र लसीकरण पूर्ण न करून घेतलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू शकतो. शासनाद्वारे वारंवार सांगूनही लोक लस घेण्यात दिरंगाई करत आहेत. म्हणून आता शेवटी औरंगाबाद (संभाजीनगर) येथील जिल्हाधिकाऱ्यांनी हा महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे.
लसीकरण वाढावे, लोकांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे, टाळाटाळ करू नये, यासाठी शासन हर प्रकारे प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील नागरिक लसीकरणास टाळाटाळ करत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. मात्र नागरिक हर प्रकारे प्रयत्न करून देखील ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे औरंगाबाद (संभाजीनगर) येथे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
ज्या नागतिकांनी कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र 85 दिवस उलटून देखील त्या नागरिकांनी अद्याप दुसरा लसीचा डोस घेतलेला नाही. अशा नागरिकांना आता दर 15 दिवसांनी 500 रुपये दंड भरावा लागेल. म्हणजे जसे दिवस वाढतील, तसा दंड देखील वाढत जाईल. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 15 डिसेंबर पासून केली जाणार आहे.
राज्यभरात अशा नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शासन लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र नागरिक दाद द्यायला तयार नाहीत. म्हणून आता औरंगाबाद (संभाजीनगर) येथे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच सर्वांनी देखील निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम