तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : काल दिवस व रात्र भर अवकाळीने पावसाने बागलाण तालुक्यातील वटार परिसरातील १४ मेंढ्या मृत झाल्या असून अजूनही अनेक मेंढ्या मृत होण्याचे शक्यता आहे. यामुळे मेंढपाळ मध्ये भीतीचे वातावरण परिसरात निर्माण झाले आहे.
वटार येथील दशरथ येसा महारणर यांच्या ८ बारकु गुजा सरक यांच्या २ ते व सायबु मलगुंडे यांच्या ४ अश्या एकूण १४ मेंढ्या मृत पावल्या आहेत एकूण अंदाजे दिड लाखाची नुकसान झाले आहे याची लवकरात लवकर दखल घेऊन शासन स्थरावर पाठवपुरावा करून योग्य ती भरपाई मिळावी असे आव्हान सरपंच कल्पनाताई खैरनार यांनी पंचनाम्याच्या वेळी केले.
वटार व परिसरातील गावांमध्ये मेंढीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक मेंढपाळांचा मेंढी व शेळीपालन व्यवसाय असून प्रत्येकाकडे शेकडो मेंढ्या अाहेत. काल दिवस रात्र अवकाळी पाऊस पडल्याने थंडी व गारठ्यामुळे अनेक मेंढ्या कुडकूडून मेल्या, घेतनेची माहिती सरपंच कल्पनाताई खैरणार यांनी कळवली असता, तलाठी रोशन परदेशी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असुन अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याचे त्यांनी सांगण्यात आहे.अवकाळी पाऊस,थंडी, गारठा निर्माण झाल्यामुळे मेंढ्या कुडकूडून मेल्या व अनेक मेंढ्याना असा त्रास होत अशी माहिती पशु अधिकारी डाॅ.साळवे यांनी सांगतले
सततचा पाऊस आणि दमट वातावरणामुळे मेंढ्या मृत पावल्याने मेंढपाळांवर अस्मानी संकट कोसळले आहे. सर्व मृत मेंढ्यांचे पंचनामे होऊन मेंढपाळांना आर्थिक मदत मिळावी. गेल्या 2 वर्षा पासुन मेंढपाळ हा जेरीस आला असून आतां हे आस्मानी संकटाने नवीन विवंचना उपस्थित झाली आहे. जर अश्या मेंढ्या मेल्या तर काही दिवसात पूर्ण कळपच बसेल तर आम्ही जगायचे कसे
– दशरथ महारनर ,मेंढपाळ वटार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम