High Court | औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद नाही ‘धाराशिव’च; उच्च न्यायालयाचा निकाल

0
21
High Court
High Court

High Court | औरंगाबाद शहराचं नाव हे ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati sambhaji nagar) आणि उस्मानाबाद शहराचं नाव हे ‘धाराशिव’ (Dharashiv) असं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र रकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. याबाबत सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, राज्य सरकारच्या या नामांतराच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवलेला होता.

स्थानिक रहिवाश्यांनी दिले होते आव्हान 

दरम्यान, हा निकाल आज जाहीर झाला असून, राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर रोजीच या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, अंतिम निकाल राखून ठेवण्यात आला होता. हा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या नामांतराच्या निर्णयाला येथील स्थानिक रहिवाश्यांनी दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळले आहे.

उद्धव ठाकरेंनी करून दाखवले; संभाजीनगर, उस्मानाबाद सह दहा महत्वाचे निर्णय

High Court | सरकारचा निर्णय योग्य… 

हा निकाल जाहीर करताना “राज्य सरकारने महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या भागात उस्मानाबाद व औरंगाबाद या शहरांचे नाव हे धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर करण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य असून, सरकारच्या या निर्णयामुळे कोणालाही काहीही फरक पडणार नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने जाहीर करत स्थानिकांच्या याचिका फेटाळल्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here