माधुरी रोहम
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; केंद्राचे चुकीचे धोरण सध्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे केंद्राने कृषी कायदे मागे घेतले पण धोरणाचे काय असा सवाल करून आम्ही कच्चे तेल आयात केलं ते धीरूभाई अंबानी ने पक्के केलं आणि अंबानी साठी तेल आयात केलं पण शेतकऱ्याच्या घरावर तलवार चालवली तेल आयात केलं नसतं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला असता असा घणाघात करत या देशात विषमता वाढली आहे. विषमता वाढली तर बच्चू कडू भगतसिंग झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन निफाड येथील शहीद स्मारक लोकार्पण तसेच दिव्यांग शेतकरी मेळाव्याप्रसंगी केले.
निफाड शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आज दिनांक 23 रोजी राज्यमंत्री बच्चू कडू तसेच म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या उपस्थितीत शहीद स्मारक लोकार्पण सोहळा तसेच दिव्यांग शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. प्रारंभी निफाड येथील अर्बन बँकेचे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने रॅली काढली ती पंचायत समिती समोर येताच या वेळी मान्यवरांचे पंचायत समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी नामदार बच्चू कडू यांनी शहीद स्मारकाचे लोकार्पण केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर प्रांत अधिकारी अर्चना पठारे तहसीलदार शरद घोरपडे पोलीस निरीक्षक रंगाराव सानप गट विकास अधिकारी संदीप कराड पंचायत समितीच्या सभापती उपसभापती सदस्य यावेळी उपस्थित होते.
शिवाजी चौकामध्ये दिव्यांग व शेतकरी बांधवांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रहारचे सर्वेसर्वा नामदार बच्चू कडू, शिवाजीराव ढवळे, सागर निकाळे, अनील कुंदे, शिवाजी ढेपले, विक्रम रंधवे, सोनाली चारोस्कर, सपना बागुल, शिवा सुराशे, सोमनाथ पानगव्हाणे, पंडित आहेर, विकास रायते, आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले छातीवर गोळ्या झालेल्या त्यांच्या हौतात्म्यातूनच देशाला स्वातंत्र्य मिळू शकले आहे. त्यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभले ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांनी केले.
निफाड येथे पंचायत समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतिस्तंभाचे लोकार्पण करताना ते बोलत होते.
यानिमित्ताने निफाड येथील शिवाजी चौकामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी व दिव्यांगांच्या मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर त्यांच्यासमवेत आदिवासी नेते आणि म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे हे उपस्थित होते.
आपल्या भाषणातून आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना सेवेचा विसर पडू देऊ नका असे आवाहन केले. नेत्यांच्या स्वागतासाठी मोठ मोठे होर्डिंग लावण्यात ऐवजी गरीबाच्या झोपडीवर छत्र टाकणे जास्त चांगले राहील. बियर बार समोरच्या रांगा रक्तदानासाठी लागल्या तर देशाचे भविष्य बदलेल. लॉक डाऊन च्या काळात मंदिर मशीद हे सारे काही बंद होते परंतु दवाखाने चालू होते. आज शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झालेली असून थकीत वीज बिल भरण्याची ताकद शेतकर्यांमध्ये उरलेली नाही, त्यामुळे आजच्या घडीला शेतकऱ्यांना फक्त चालू बिल भरण्याची सवलत मिळावी. या देशात प्रचंड विषमता पसरलेली असून या विषमतेला शासनाची धोरणे कारणीभूत आहेत. उद्योगपतींच्या हितासाठी सरकारने तेल आयातीचा निर्णय घेतला परंतु त्याचा फटका सोयाबीनचे भाव प्रचंड कोसळल्याने शेतकऱ्यांना सोसावा लागला. अशा अनेक मुद्द्यांवर ना. बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल सोनवणे यांनी तर संचालन राजेंद्र सोमवंशी यांनी केले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] […]