द पॉईंट प्रतिनिधी : देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले आहे. देश आजही सैनिकांच्या हातात सुरक्षित असून आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. याच दृष्टिकोनातून प्रहार संघटनेचे संजय दहिवडकर यांनी दहिवड ग्रामपंचायतीला पत्र देऊन 15 ऑगस्ट रोजी होणारा ध्वजारोहण कार्यक्रम आजी अथवा माजी सैनिकांच्या हातून व्हावा अशी मागणी पत्राद्वारे केली.
यावेळी प्रशांत खैरनार, निंबा पवार, जगन्नाथ सोनवणे, जगन्नाथ बागुल, श्याम पवार, जीभाऊ निकम ,दीपक पवार, प्रशांत सोनवणे , गंगाधर खैरनार, हेमंत सोनव, शरद मोरे, विनोद बसते, भाऊसाहेब बागुल, देविदास मोरे, त्र्यंबक सोनवणे, बापू शिंदे, दादाजी बेलदार, निलेश मोरे, सुदर्शन मोरे, शरद देवरे, रमेश सोनवणे, धीरज सोनवणे, धर्मा सोनवणे, कृष्णा पवार, गणेश शिंदे आदी गावकऱ्यांनी स्वाक्षरी करून पंचायतीला पत्र पाठवले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी गाव पुढारी तसेच सरपंच,उपसरपंच,सदस्य उत्साही असतात. मात्र हा पुरोगामी विचार प्रत्येक गावाने आमलात आणल्यास, आपल्यातर्फे सैनिकांच्या कर्तुत्वाला योग्य न्याय द्यायची सुरवात गावातून होईल, व हा बदल नक्कीच क्रांतिकारक असेल यात काही शंका नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम