Mumbai : मुंबईत पोटाच्या विकारांची शिरजोरी,काय आहेत कारणे?

0
49

Mumbai : दिग्दर्शक हंसल मेहता यांना गुरुवारी सकाळी स्टमक इंफेक्शन झाले याबद्दल ट्विटरवर त्यांनी माहिती देताना बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि विविध राजकारण्यांना टॅग केले.

Shasan aaplya dari : नाशकात आज नऊ मंत्र्यांची उपस्थिती ; कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

”जेवणापूर्वीच मला त्रास झाला. मी फॅमिली डॉक्टरांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांना दररोज समान लक्षणे असलेले किमान १० रुग्ण दिसत आहेत आणि काहींना तर रुग्णालयात अॅडमिट केले आहे. हे इंफेक्शन पिण्याच्या पाण्यातील बगमुळे आहे”अशी माहिती मेहता यांनी ट्विटमधून दिली.

त्यांच्या या ट्विटनेमुळे नागरी संस्था कामाला लागली असून, सुमारे १० लोकांनी वांद्रे पश्चिम येथील त्यांच्या गृहनिर्माण सोसायटीत जाऊन चाचणीसाठी पाण्याचे नमुने गोळा केले. नगरपालिकेला जागे करण्यासाठी संतप्त ट्विट करावे लागते,हे पहिल्यांदा घडले नसेल. दूषित पाण्यामुळे आजारी पडणारा मी एकटा नाहीये. अनेक लोकांना बाधा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Jharkhand : टिकली प्रकरण की जातीयवाद? झारखंडच्या त्या विद्यार्थीनीच्या आत्महत्येचं खर कारण काय?

एका दिवसानंतर बीएमसीने याच प्लॅटफॉर्मवर त्यांना उत्तर दिले की “एच वेस्ट वॉर्ड ऑफिसने या प्रश्नातील निवासस्थान आणि इमारतीतील पाण्याच्या टाक्या आणि पाणीपुरवठ्याची तपासणी केली आहे. तपासणी दरम्यान पाणी दूषित असल्याची कोणतीही चिन्हे आढळून आली नाहीत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून, या ठिकाणच्या बीएमसीच्या पाणीपुरवठ्याचा नमुना घेऊन तो चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.” नागरी संस्थेने यात आणखी सांगितले ती त्यांना परिसरातून पाणी दूषित झाल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही.

मेहता यांचे ट्विट हे एक इशारा ठरला असून, नागरिकांनी प्रतिसाद देत समान लक्षणे शेअर केली आहेत. कांदिवली पश्चिम येथील आरएनए रिजन्सीचे सदस्य योगेश शिंदे यांनी काळ्या रंगाच्या पाण्याच्या बाटल्यांची छायाचित्रे शेअर केली आहेत. जुहूचे रहिवासी करण व्यास म्हणाले, “मी आणि माझी पत्नी दोघेही गेल्या काही दिवसांपासून आजारी आहोत. मेहता यांच्यासारखीच लक्षणे आमच्यातही होती.

बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), पी वेलरासू या विषयावर भाष्य करण्यासाठी उपलब्ध नव्हते. तर आरोग्याच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी दक्षा शाह यांनी नागरी संस्थेकडे नोंदवल्या जाणार्‍या प्रकरणांच्या संख्येत वाढ होण्यामागे केवळ वाढत्या संख्येला दोष दिला. अलीकडच्या काळात ते २५ वरून ८०० पर्यंत वाढले आहे, असे त्या म्हणाल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here