उद्धव ठाकरे यांचे एसटी कर्मचाऱ्यांशी गोड बोल

0
37

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या कित्येक दिवसांपासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने या सगळ्या आंदोलनाचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. सामान्य जनतेची अडचण लक्षात घेऊन आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामंडळ कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे, असे ‌‌भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

सध्या एसटी महामंळाचा संप असल्याने संपूर्ण महाराष्ट्र या अडचणीला सामोरे जात आहे ऐन सणासुदीच्या काळात हा संप चालत असल्याने सामान्य माणूस खूप समस्यांना सामोरे जात आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी हि विनंती केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here