Sambhaji Raje in Deola: शेती परवड नाही म्हणून आम्ही विकतोय….

0
148
माळवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांना निवेदन देतांना अविनाश बागुल, अमोल बागुल,सरपंच शिवाजी बागुल आदी (छाया - सोमनाथ जगताप )

Sambhaji Raje in Deola : शेती करने परवडत नाही , त्यामुळे आम्ही गावच विकण्याचा निर्णय घेतलेल्या तालुक्यातील माळवाडी गावाला आज शुक्रवारी दि १० रोजी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थित शेतकऱ्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेऊन गाव विकण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात पुनर्विचार करावा , अशा प्रकारे कुठलाही निर्णय घेऊ नका ,मी तुमच्या भावना समजू शकतो .मी तुमच्या बरोबर आहे. (Sambhaji Raje in Deola )

Blood group: दुसऱ्या रक्तगटाचे रक्त एखाद्याच्या शरीरात चढवले तर काय होईल?

माळवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांना निवेदन देतांना अविनाश बागुल, अमोल बागुल,सरपंच शिवाजी बागुल आदी (छाया – सोमनाथ जगताप )

कांद्याला भाव मिळत नाही ,अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे .याची सरकारने दखल घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले. तालुक्यातील माळवाडी येथील ग्रामस्थांनी कांद्यासह इतर शेती मालाला भाव मिळत नसल्याने, शेती करने परवडत नाही यामुळे संपूर्ण माळवाडी, फुले माळवाडी गांवातील शेतकऱ्यांनी आम्हाला शेती व्यवसायातुन काहीही मिळत नसल्याने,चार पाच दिवसांपूर्वी संपूर्ण गावातील ग्रामस्थ व इतर तरूण शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने गावच विकण्याचा ठराव करून निर्णय घेतला आहे.

केंद्रं आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या वर गांव विकण्याची वेळ आली आहे . असे संताप यावेळी व्यक्त केला. माळवाडी गावाने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा म्हणून आज बागलाण तालुक्यातील मुंजवाड गावाने ही पाठींबा देत राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे भोसले यांनी शुक्रवारी (१०) रोजी माळवाडी येथे येऊन ग्रामस्थांची भेट घेतली व ,समजुत काढण्याचा प्रयत्न केला.दरम्यान,या भेटी प्रसंगी शेतकऱ्यांच्या व्यथा व अडचणीचे पत्र आणि ,तुकडे बंदी कायदा रद्द बाबत निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने अविनाश बागुल, अमोल बागुल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना दिले. यावेळी शिवनिश्चल फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी त्यांचे स्वागत केले .

याप्रसंगी सरपंच शिवाजी बागुल , हिरामण शेवाळे , ग्रामविकास अधिकारी संभाजी देवरे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव, तसेच देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष पंडितराव निकम यांनी देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here