द पॉईंट नाऊ; वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या भूमीचा अनमोल दागिना आहे. आणि याच दागिन्याच्या शिलेदारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. वारकऱ्यांना विठुरायाच्या वारीसाठी आता कसलेही बंधन राहणार नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घोषित केले आहे.
सारे वारकरी आता आपल्या लाडक्या पंढरीच्या विठु माऊलीला भेटायला जाऊ शकणार आहेत.
येत्या 15 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या कार्तिकी वारीला आता वारकरी जाऊ शकणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या वारीला मज्जाव करण्यात आला होता. आषाढी एकादशीला देखील वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यापासून वंचित राहिले.
मात्र आता वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी नसेल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने आता वारकऱ्यांना कोणत्याही बंधनाला सामोरे जावे लागणार नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम