Maharastra Governor: महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली असून अशा स्थितीत महाराष्ट्राचा नवा राज्यपाल कोण होणार या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेत पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव आघाडीवर आहे. कॅप्टनबाबत भाजप हायकमांडमध्ये एकमत झाल्याचे खात्रीलायक सूत्रांचे वृत्त असून औपचारिक घोषणा लवकरच होऊ शकते.
पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध आहेत
कॅप्टन अमरिंदर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध मानले जातात. यामुळे भाजपने आपल्या 83 सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीत कॅप्टन यांचा समावेश केला आहे. यापूर्वी उपराष्ट्रपतीपदासाठीही कॅप्टन यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र त्यावेळी कॅप्टन आजारपणावर परदेशात उपचार घेत होते. त्यामुळेच पक्षाने पश्चिम बंगालचे राज्यपाल (Governor) असलेले जगदीप धनखर यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले होते. पण आता महाराष्ट्रात भाजप अमरिंदर यांना मोठी जबाबदारी देऊ शकते.
काँग्रेस सत्तेबाहेर
पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या 3 महिन्यांपूर्वी काँग्रेसने कॅप्टन यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले होते. त्यानंतर कॅप्टन यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. कॅप्टन भाजपसाठी विधानसभा निवडणुकीत कोणताही करिष्मा दाखवू शकले नाहीत, पण पंजाबमध्ये काँग्रेस नक्कीच सत्तेतून बाहेर फेकली गेली. पंजाबमध्ये कॅप्टनचा मोठा प्रभाव आहे. कॅप्टन यांचे वडील पतियाळा संस्थानाचे शेवटचे महाराज होते. कॅप्टन यांनी 1963 ते 1966 या काळात भारतीय सैन्यातही काम केले आहे. याशिवाय कॅप्टन हे मुख्यमंत्री आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांनी पक्षातील अस्थिरतेला कंटाळून भाजपचा झेंडा हाती घेतला याचा फटका काँग्रेसला बसला असला तरी भाजपला मात्र फारसा काही फायदा झाला नाही. मात्र भविष्यात विचार करता भाजपसाठी ते महत्वाचे आहेत.
कोश्यारी यांना राज्यपालपद सोडायचे आहे
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वीही त्यांना अनेक वादांनी घेरले आहे, अशा स्थितीत महाराष्ट्रातील नव्या राज्यपालांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून मविआ व भगत सिंग कोश्यारी यांच्यात वेळोवेळी खडाजंगी झाली. राज्यपाल यांनी अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेक मोर्चे देखील निघाले मात्र हे मोर्चे निघून देखील कोष्यारी हे पदावर कायम होते. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या टार्गेट वरती कोषयारी कायम राहिले असून त्यांच्या हातून वेळोवेळी झालेले वादग्रस्त वक्तव्य हे विरोधकांना बळ देणाऱ्या ठरल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम