Maharashtra Politics देशात २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, मात्र या निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत ज्या कोणत्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
राज्यातील वातावरण ढवळून निघालेले असून भाजपा शिंदे गट विरुद्ध अन्य असा सामना राज्यात बघायला मिळतोय. याच वेळी देशात २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असल्या तरी देशातील सर्व प्रमुख पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली असून 2019 च्या लोकसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास महाराष्ट्रात भाजपला 23 जागा (27.59 टक्के मते), काँग्रेसला एक, राष्ट्रवादीला चार, AIMIM ला एक आणि शिवसेनेला 18 जागा मिळाल्या आहेत.
आता लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात कोणाला फायदा?
दरम्यान, इंडिया टुडे-सी-व्होटरने एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार आता लोकसभा निवडणूक झाल्यास यूपीएला (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी) 34 जागा मिळू शकतात. म्हणजेच एकूण मतदानाच्या 48 टक्के वाटा यूपीएच्या खात्यात जाऊ शकतो. आता निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस चमत्कार करू शकते, असा या सर्वेक्षणाचा अर्थ स्पष्ट आहे. त्याचवेळी हा सर्व्हे एनडीएसाठी (भाजप आणि शिंदे गट) मोठा धक्का ठरू शकतो.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केल्यावर MVM म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युती सरकारला सत्तेतून बाहेर काढावे लागले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात गेले आणि फ्लोअर टेस्टपूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. नंतर शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि ते मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात ही नवी राजकीय आघाडी तयार झाली असून, त्याची पहिली कसोटी आगामी बीएमसी निवडणुका पाहिली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम