
देवळा : स्मार्ट ग्राम योजनेंर्तगत तालुक्यातील वरवंडी, वार्षी,शेरी, वाजगाव व विठेवाडी येथे मंगळवारी ( दि.१७) रोजी या गावांना तालुका बाहेरील समितीने भेट देऊन पाहणी केली . शासनाच्या वतीने निकषात बसणाऱ्या सुंदर गावांना १० लाख रुपयांचे बक्षीस देऊन संबधीत गावाला स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

यासाठी तालुक्यातील वरवंडी, वार्षी, शेरी, वाजगाव व विठेवाडी या गावांना मंगळवारी समितीने भेट देऊन पाहणी केली. यासाठी ठरून दिलेल्या निकषात कोणत्या गावाची निवड होते. हे लवकरच कळणार आहे. या समिती मध्ये नांदगावचे गटविकास अधिकारी जी पी चौधरी , सहायक गटविकास अधिकारी एस डी दळवी ,आदींसह डी एस मांडवडे , विस्तार अधिकारी बी एस बोरसे साहेब , कृषी, कृषी विस्तार अधिकारी एस के तुपे , एस एम जोशी ,एस बी मोहिते यांचा समावेश होता.
यावेळी देवळ्याचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख , विस्तार अधिकारी जयवंत भामरे उपस्थित होते . वरवंडी गावात आलेल्या समितिचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. याप्रसंगी सरपंच भाऊदास गवळी , उप सरपंच . भरत शिंदे, ग्रा पं सदस संदीप बच्छाव , ग्रामसेविका. सरिता मिस्तरी आदींसह रवींद्र वाघ, विलास शिंदे, प्रकाश बच्छाव, महेश वाघ , रावसाहेब शिंदे, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम