
देवळा : जन्मदात्या आई-वडिलांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले. त्यांचा सांभाळ करणे हे मुलांचे आद्यकर्तव्य आहे. मात्र, त्याचा विसर मुलांना पडत चालल्याने वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. मात्र ग्रामीण भागातील पवार कुटुंबीयांनी आपल्या वडिलांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करत एक आदर्श घालून दिल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा यशवंत गोसावी यांनी वडाळा,भऊर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंदराव पवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमीत्त बोलताना व्यक्त केले.

सह्याद्री अग्रोचे चेअरमन विलास शिंदे, मविप्रचे माजी संचालक डॉ विश्राम निकम, गुरुदत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ जे डी पवार, ए व्ही बोयलर्सचे संचालक कृष्णा गांगुर्डे, व्यंकटेश्वरा हचरीजचे डॉ केदार काळे, शरदराव पवार पतसंस्थेचे चेअरमन योगेश आहेर, प्राचार्य हितेंद्र आहेर, एनडीसीसी बँकेचे माजी चेअरमन धनंजय पवार ,बाबुराव पाटील, रोटरीचे माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, वासोळचे सरपंच स्वप्नील पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वप्नील अग्रोचे संचालक अरुण पवार यांनी प्रस्ताविक केले. समाजात गरीब-श्रीमंत दरी वाढत असून, सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली. यामुळे माणसांविषयीची आपुलकी कमी होत आहे. याला थोपवायचे असल्यास अहंकार, गर्व बाजूला ठेवून निरपेक्ष वृत्तीने सेवा करा, यातून मनाला समाधान मिळेल असा विश्वास बाबुराव पाटील यांनी व्यक्त केला.
आज अनेक कुटुंबात जेष्टांची कैफियत असून पवार कुटुंबियांचा वडिलांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करण्यातून ग्रामीण भागातील कुटुंबाना चांगला बोध व शिकवण मिळाल्याचे प्रतिपादन डॉ व्ही एम निकम यांनी बोलताना व्यक्त केला.
यावेळी गोविंद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भऊर , भऊरनेपाळी, भऊरबोदाडी, भऊरदत्तनगर, भऊरपूर्व, भऊरपश्चिम या जिल्हा परिषद शाळांना वाटर प्युरीफायर तसेच भऊर सिद्धेश्वर विध्यालयास दोन संगणक यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सुपुर्थ करण्यात आले.
कुटुंबियांकडून गोविंदराव पवार यांचे औक्षण करण्यात येऊन कार्यक्रमास उपस्थित एकहजार लोकांना यावेळी प्राध्यापक यशवंत गोसावी यांच्या थोरांच्या यशोगाथा हे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी सह्याद्री अग्रोचे चेअरमन विलास शिंदे यांनी कार्यक्रमास उपस्थित कसमादे भागातील तरुण व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास काशिनाथ पवार ,देवराम पवार, निलेश दळवी, पांडुरंग पवार, हिरामण पवार, छबु पवार, प्रभाकर पवार , रमेश पवार, अर्जुन पवार ,दयाराम पवार,मनोहर गांगुर्डे, रवींद्र पवार, दीपक पवार ,राजेंद्र पवार, हेमराज पवार, दिनेश पवार, शरद पवार, केदा पवार, बापू पवार, विलास पवार, दुष्यंत पवार, अभिमन पवार, प्रीतेश ठक्कर, पंकज जाधव, कौत्तिक पवार, सचिन पवार, स्वप्निल ऍग्रोचे कर्मचारी तसेच भउर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. भगवान आहेर यांनी सूत्रसंचालन केले तर वैभव पवार यांनी आभार मानले.
खरं तर आईवडीलांच्या ऋणातुन कधीच कुणाला मुक्त हाेता येणार नाही. आजच्या डिजीटल युगात, विभक्त हाेणा-या वातावरणांत घरातील वडीलधा-यांची सेवा व त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञता साेहळ्यातुन याेग्य ते संस्कार पुढील पिढिकडे वर्धित हाेतील.
– अरुण पवार ,संचालक स्वप्नील ऍग्रो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम