मानवी जीवनात गीत, संगीत ,मनोरंजन यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनोरंजन हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अविभाज्य भाग आहे. यात वादन, गायन, नृत्य, अभिनय..इ.महत्वाचे भाग आहेत..या सर्वांचे एकत्रित रूप म्हणजे गीत.
भारताच्या इतिहासात अनेक प्रख्यात, गुणी, सुमधूर, लोकप्रिय गायक होऊन गेले. या सर्वांमध्ये एक नाव अत्यंत आदराने, प्रेमाने आणि आत्मियतेने घेतले जाते…ते नाव म्हणजे दिवंगत मोहम्मद रफी साहेब. मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ ला पंजाब येथील कोटला सुलतान सिंघ येथे झाला. अगदी बालपणापासून एका फकीराचे गाणे ऐकून त्यांना गायनाची प्रचंड गोडी लागली होती. वयाच्या १३ व्या वर्षीपासून ते गायन शिकायला गुरूकडे जायला लागले. प्रथमतः त्यांना ‘गुल बलोच’ या पंजाबी चित्रपटाचे गीत गाण्याची पहिली संधी १०४४ साली मिळाली. वयाच्या २० व्या वर्षी ते मुंबईत आले. त्यांचा गोड, सुरेल आवाज ऐकून त्यांना १९४५ साली ‘गांव की गोरी’ या पहिल्या हिंदी चित्रपटात गायनाची संधी मिळाली. त्यांच्या आवाजावर आणि गायन शैलीवर रसिक फिदा झाले. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटात गायनाच्या अनेक संधी मिळाल्या आणि ते हिंदी सिनेमा जगतात पार्श्वगायक म्हणून नावारूपाला आले.
मोहम्मद रफी यांनी एकाहून एक सरस अप्रतिम गीते गायली. प्रणयगीते, बालगीते, भक्तीगीते, देशभक्ती गीते, शास्त्रीय संगीतावर आधारित गीते…गझल, कव्वाली.. सर्व प्रकारची गीते गाऊन संपूर्ण जगात प्रेम, आपुलकी, कीर्ती, प्रसिद्धी मिळवली…त्यांनी त्याकाळच्या आघाडीच्या सर्व गायक व गायिका़ंसोबत गीते गायली. १९८० पर्यंतच्या चित्रपट सृष्टीतील जवळपास सर्वच अभिनेत्यांसाठी त्यांनी गाणी गायली. सुश्राव्य आवाज आणि अफलातून गायन शैली यामुळे त्यांनी जनमानसांच्या ह्रदयावर राज्य केले. ते कधीच मोठ्या आवाजात कुणाला रागावले नाहीत.
त्यांचा स्वभाव अतिशय नम्र आणि दयाळू होता… पैशासाठी ते स्वतःहून कोणालाही विचारीत नसत. त्याकाळी फक्त १ रूपयात देखील त्यांनी गाणे गायले. त्यांनी गायलेले..
सुख के सब साथी,
दुख मे ना कोई….हे भजन आताही प्रत्येकांच्या ओठांवर आहे..
बार बार दिन ये आये.
बार बार दिल ये गाये
तू जीये हजारो साल ये मेरी है आरजू
हँपी बर्थडे टू यू…..हे गीत तर कोणाच्याही वाढदिवसाला ओठावर आल्याशिवाय राहत नाही.
प्रणयगीते तर विचारायलाच नको…
कितना प्यारा वादा है इन मतवाली आंखो का…
मस्त बहारोंका मै आशिक….
बाहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है….
ये मेरा प्रेम पत्र पढकर..के तुम नाराज ना होना…..
तेरे घर के सामने एक घर बनाऊगा..तेरे घर के सामने…
ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखे….
बदनपे सितारे लपेटे हुए..ऐ जाने तमन्ना किधर जा रहे हो…
ये चांद सा रोशन चेहरा….
दिवाना हुवा बादल….ये देखके दिल झुमा…
काही दर्दभरे गीत,
पत्थर के सनम
तुझे हमने मुहब्बत का खुदा माना
बडी भूल हुई अरे हमने
ये क्या समझा
ये क्या जाना…पत्थर के सनम..
गम उठाने के लिए मै तो जिये जाऊंगा..
ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही..
… किती किती आठवायचे?? किती सुंदर गीते!…किती मोठा गाण्यांचा खजिना! ….रफी साहेब आपल्या सर्वांना विनामूल्य देऊन गेले.
जहां डाल डाल पर सोने की
चिडिया करती है बसेरा
वो भारत देश है मेरा……..,
कर चले हम फिदा
जान और तन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियो…
या गीतांशिवाय तर १५ आँगष्ट स्वतंत्रता दिवस आणि २६ जानेवारी गणतंत्र दिवस….यांची कल्पना करणेच अशक्य आहे.
या स्वर्गीय आवाजाच्या जादूगाराने तब्बल १८ भाषांमध्ये ( इंग्रजी,पारसी,डच आदी.) २६ हजारांवर गाणी गायली आहेत…
मराठीतील कोळी गीत….
अग पोरी ,सांभाळ दर्याला तुफान आयलयं भारी
आणि ….शोधिशी मानवा राऊळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी
ही मोहम्मद रफींची गाणी आताही आपल्याला भुरळ घालतात.
बालगीते….रे मामा रे मामा रे
हम तो गये बाजार मे
लेने को लड्डू
लड्डू वडृडू कुछ ना मिल
पिछे पडा टट्टू….
आजवर आपण साऱ्यांनी त्यांनी गायलेली गीते गायली. त्यांच्या गाण्यांवर नाचलो..त्यांची गाणी ऐकून आपल्याला कधी आनंद मिळाला, कधी प्रेरणा तर कित्येकदा आपण आपली सारी दुःखं विसरून एका वेगळ्याच विश्वात रममाण झालो…
असा सुमधूर आवाजाचा बादशहा लवकरच जगाला अलविदा करून गेला. ३१ जुलै १९८० साली त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या सारखे कुणी झाले नाही आणि होणारही नाही.
त्यांचा जादूई सदाबहार आवाज या आकाशात सतत गुंजतो आहे आणि गुंजत राहणार…एक सच्चा आणि अच्छा गायक कलाकार आज आपल्यात नाही. परंतु त्यांच्या आवाजाच्या रूपाने ते सदैव आपल्या सोबत आहेत आणि राहतील.
दिवंगत मोहम्मद रफी साहेब यांच्या पावन स्मृतींना शत:शत: प्रणाम
लेखिका,
सुनिता तागवान
आरमोरी जि गडचिरोली
+91 97648 88759
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम