मुलींना पटविण्यासाठी जादू टोण्याचा आधार ; पुरोगामी महाराष्ट्रात मुली भयभीत

0
51

द पॉइंट नाऊ : तांत्रिक अन् मांत्रिक या देशात काही कमी नाहीत मात्र आता याचा वापर थेट मुली पटविण्यासाठी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिह्यात समोर आला आहे. कोल्हापूर शाहू फुले आंबेडकर विचारांचा पुरोगामी जिल्हा मात्र या जिल्ह्यात हे धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे, शाहू महाराजांनी या ठिकाणी समाजसुधारणाचा पाया रोवला अन् त्याचा प्रसार देशभरात झाला. मात्र या जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आल्याने महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे मुलींचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळी खुर्द गावाच्या परिसरात मुलींची छायाचित्रे ठेवून उतारा करण्याची अघोरी घटना घडली आहे. या उताऱ्यामध्ये हळद-कुंकू, लिंबू आणि त्यावर टोचलेल्या टाचण्या, मुलींचे फोटो, हिरवे कापड असे साहित्य सापडले आहे. हे सर्व काही मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी होत असल्याचे समोर आले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे गावातील पालक व मुलींमध्ये भीतीचं वातावरण असून पुरोगामी शाहू महाराजांच्या कोल्हापुरातील या प्रकाराने जिल्हा हादरला आहे.

कोल्हापुरात जे काही आढळले ते संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात सुरू असते मात्र काही प्रकरण निदर्शनास येतात तर काही नाही, असे प्रकार निंदनीय असून मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा घाट घातल्याचे समोर आले आहे. मुलींचे वशीकरण करण्यासाठी असा अघोरी प्रकार केल्याचं गावकरी संतप्त झाले आहेत. मात्र इथून पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं सांगत गावकऱ्यांनी रात्रभर गस्त घालण्याचं ठरवले याशिवाय गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ही केवळ एक अंधश्रद्धा तसेच नीचवृत्ती असून अशा कोणत्याही गोष्टींना घाबरून जाऊ नये असे आवाहन नागरिकांनी केले आहे. घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे.

मुलींचं घराबाहेर निघणे बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळी खुर्द काळ्या जादूच्या या अघोरी प्रकारामुळे आता हे रस्ते, हे गाव सामसूम झाल्याचं चित्र असून गावच्या लेकींवर कुणीतरी करणी करत असल्याची भीती गावकऱ्यांच्या मनात बसली असल्याने त्यामुळे गावच्या मुलींचे घराबाहेर पडणं मुश्किल झाल्याचं चित्र आहे. घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे मुलींची शाळा बंद होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

प्रशासनाने लक्ष घालावे
टाचण्या टोचलेले लिंबू, हळद-कुंकू, हिरवं कापड आणि त्यासोबत मुलीचा फोटो असा प्रकार समोर आल्याने गावकरी भयभीत झाले असून गावकरी दिवसरात्र गस्त घालण्याच्या तयारीत आहेत. हे असे प्रकार थांबवण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न केले जात असले तरी प्रशासकीय पातळीवरुनही लक्ष दिले पाहिजे. एका गावात सुरू झालेल्या या करणीचं जाळं आख्या महाराष्ट्रात पसरायला वेळ लागणार नाही अशी शंका देखील उपस्थीत होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here