कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात समाजशास्त्र मंडळाचे उदघाटन

0
60

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्य लढयात कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी यातना भोगत दिलेले योगदान म्हणजे खऱ्या देशभक्तीचे ते द्योतक आहे असे प्रतिपादन एच.पी.टी. महाविद्यालयाचे प्रा.डॉ. रामदास भोंग यांनी केले. येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात बुधवार (दि.२७) रोजी समाजशास्त्र मंडळाच्या उदघाटनावेळी ‘आझादी का अमृत महोत्सव’ या विषयावर ते बोलत होते. प्राचार्य हितेंद्र आहेर अध्यक्षस्थानी होते.

देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात समाजशास्त्र मंडळाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना प्रा.डॉ.रामदास भोंग, समवेत प्राचार्य हितेंद्र आहेर व इतर. (छाया – सोमनाथ जगताप )

प्रा.डॉ.भोंग म्हणाले की या कार्यात देवळा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचाही सहभाग होता. त्यात तुकाराम थावबा पाटील, अमृता राघो पाटील, शंकर सहादू पाटील आदींनी १९४२ च्या चलेजाव आंदोलनात तसेच १९३० च्या जंगल सत्याग्रहात सक्रिय राहत ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध कार्य केले. यावेळी त्यांनी इतरही संदर्भ देत आपल्या व्याख्यानात रंगत आणली. प्रा.व्ही.डी.काकवीपुरे यांनी प्रास्ताविक केले. समाजशास्त्र मंडळाचे यावेळी उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए.बी.पवार, प्रा. डॉ.मालती आहेर, प्रा.डॉ.जे.व्ही.चंद्रात्रे, प्रा.डॉ.जयवन्त भदाणे, प्रा.आबा देवरे, प्रा.व्ही.एम.जोशी, डॉ.संजय बनसोडे, प्रा.ए.ए.बोरसे, प्रा.आर.जे.पगार उपस्थित होते. मनीषा सूर्यवंशी यांनी आभार मानले. सर्व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here