ठाणे- घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांकडून ठाणे महानगर पालिके सामोर आंदोलन करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांचा २ महिन्याचा पगार थकीत आहे. या साठीच श्रमजीवी संघटना आक्रमक झाल्याचे आज आपल्याला ठाणे महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर दिसून आले. या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे सांगितले कि , ‘ गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार वेळेवर दिला जात नाही. महापालिकेच्या करार नुसार महिन्याच्या १० तारखेनंतर कर्मचाऱ्यांना पगार दिल्यास त्यात पॅनेलटी सुद्धा मिळवली जाते. पण ही गोष्ट एकाद्या वेळेची नाही प्रत्येक महिन्याची आहे. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांना पी एफ देखील गेल्या दोन वर्षात जमा केला गेला नाही. जर कामगारांचा पी एफ च जमा केलेला नसेल तर त्यांना गरजेच्या वेळी लागणाऱ्या पैशांची समस्या कोण सोडवणार?’.
जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जवळपास ३०० ते ३५० कर्मचाऱ्यांचा पगार थकीत असल्याचे सांगितले आहे. ‘आयुक्तांना कितीतरी वेळा सांगूनही पगार वेळेवर मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सागितले. कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुपरवाईजर , अधिकारी यांच्या बोलून फक्त आश्वासने दिली जात आहेत. कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. एवढेच काय तर त्यांना घरात कुटुंबासाठी सुद्धा पैसे देता येत नाही. वारंवार आंदोलन करूनही कामगारांना न्याय मिळत नाही.’ असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम